Monday, March 23, 2009

पैसा...

राम आणि शाम दोघे मित्र...
दोघे एकदम हुशार आणि मेहनती...
दोघे उच्च शिक्षीत...
कॉलेज संपल्यानंतर ते एके ठिकाणी इंटरव्यू साठी गेले...
इंटरव्यू झाला ...
राम पास तर शाम नापास झाला..
राम ने तिथेच 1-2 वर्ष काढली...शाम ने दुसर्या कंपनी मधे जॉब सुरू केला..
राम ची कंपनी मोठी असल्याने त्याचा पगार लगेच वाढत गेला..
शाम ची कंपनी छोटी होती म्हणून त्याचा पगार काही वाढला नाही..
राम छान पैकी पैसे कमवायला लागला...शाम कसबसा जगू लागला...
राम ला पैशांची मग हाव सुटली...शाम मात्र शांत होता..जे मिळेल त्यात समाधानी होता..
राम ने मग नोकर्या बदलायला सुरवात केली...एक झाली की दुसरी...
शाम ने मात्र एकाच कंपनी मधे जम बसवला..
राम ने पैसे मिळवण्याच्या नादात गाव सोडले..दुसर्या गावी जाऊन तो जॉब करू लागला...घरापासून दूर...
शाम सुद्धा हुशार असल्याने त्याला ही अशा ऑफर येऊ लागल्या...
राम ने क्षणाचाही विचार करता लगेच दुसर्या गावी बिस्तर हलवले..
शाम ने मात्र आपल्याच गावात राहण्याचा निर्णय घेतला..आणि त्याने दुसर्या कंपनी ला नाही म्हणून सांगितले...
राम पैशासाठी मग गावोगवी फिरू लागला...त्याला पैसा मिळत होता पण टेन्षन सुद्धा तितकेच वाढत होते...
बरोबर कुणी नाही...बस तो एकटा आणि पैसे...घरची मंडळी सुद्धा नाही...
इकडे शाम घरच्या लोकांबरोबर खुश होता..पैसे कमी मिळत असले तरी तो समाधानी होता...
आणि मिळणार्या पैशांवर घर चालवत होता..कुठलीही हाव करता...
राम ने परगावी छान घर बांधले...आलिशान एकदम मोठे...
पण त्या घरात राहायला लोकं मिळेनात...तो एकटा भुता सारखा राहू लागला...
इकडे शाम ने गावातले आपले घर मिळणार्या पैशांमधे दुरुस्त करून घेतले...
घर लहान होते पण घरातले मनाणे मोठे होते...

राम च्या घरात सर्व सुख सोयी होत्या .. पण त्याचे काही मन लागेना...
त्याला आधरची गरज होती..पण जवळ कुणीच नव्हते...
या उलट शाम कडे आधार होता..आई आणि वडिलांचा ..आणि गावात राहणार्या आपल्या मित्र मंडळींचा...
खूप वर्ष लोटले गेले...

60 वर्षांनंतर....
राम ने गडगंज प्रॉपर्टी कमावली...
शाम मात्र 60 वर्षं पुर्वी होता तसाच राहिला..गरीब...
दोघेही अचानक मरण पावले...
दोघेही रिकाम्या हाताने आले होते आणि रिकाम्या हातानेच त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला...
राम च्या बरोबर त्याने कमावलेली प्रॉपर्टी आली नाही...पण हे पाहायला तो जिवंत राहिला नव्हता..
त्याने आयुष्य भर मर मर केली...कशासाठी ?? पैशासाठी ???
पण त्याच्या सोबत काय आले ??? 1 रुपया सुद्धा नाही...
ज्या पैशांवर त्याने इतके जिवापाड प्रेम केले त्यानेच त्याला असा दगा दिला...

राम ने संपूर्ण आयुष्य एकटयानेच काढले...
ज्या वयात आई वडिलांना त्याची गरज होती त्या वेळी तो पैशाच्या मागे होता..
जगाच्या नजरेत राम एक यशस्वी माणूस होता...आणि शाम एक अपयशी माणूस...
पण त्यांच्या आई वडिलांच्या नजरेत तर काही और होते...
खरच राम यशस्वी होता का ??? आणि शाम अयशस्वी ???

No comments: