Tuesday, May 5, 2009

आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे...

आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
सर्वांचा विश्वास हरवून बसल्या सारखे वाटते आहे.
नक्की कारण मी नाही लिहु शकत ... पण खरच आज मला कुणीतरी खांद्यावर डोके ठेवण्यासाठी पाहिजे आहे.
एरवी बडबड करणारा मी एक कार्टून आता शांत झाला आहे.
आज आत्ता जरी मला मरण आले तरी मी ते आनंदाने स्वीकारायला तयार आहे.

पण खरच सांगतो..
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.
आयुष्याचा जाम कंटाळा आला आहे.



मी जिंकणार आहे..

होय माहिती आहे मी आज कुठेतरी कमी पडलो आहे.
पण उद्या मी पुन्हा उगवणार...
त्याच तेजाने..त्याच शक्तीने..त्याच हिमतीने...त्याच आवेषाने..

आज मी हरलो असेनाही कदाचित...पण उद्या मी जिंकणार आहे.
आज मी मागे पडलो असेलही..पण उद्या मी सर्वांच्या पुढे असणार आहे.

आज मिळालिही असतील हजारो दुख्खे ..
पण उद्या मी त्याच दुखांकडून हिंमत घेऊन एक नवी भरारी मारणार आहे.

आज टोचले ही असतील काटे मला कुणी...
पण उद्या त्यातूनच मी गुलाब उगवणार आहे.

ज्या क्षणात आले टचकन डोळ्यात अश्रू...
तो क्षण पुन्हा मी आनंदाने जगणार आहे.

मतीमधे मिसळून ज्यांनी मला मारले..
त्यांनाच मातीचा सुगंध मी देणार आहे.

............................ उद्या मी जिंकणार आहे.