Tuesday, April 14, 2009

निवडणुका आणि आपण

निवडणुका आल्या...
आणि ह्यांची फक्वेगिरी सुरू...
असले डोके पिकले आहे म्हणून सांगतो...
च्यायला, सर्व साले हरमखोर आहेत...
काय एकमेकांवर आरोप चालू आहेत वा वा..
छान प्रतिमा ठेवताहेत तुम्ही देशा समोर.
एक म्हणतो पंतप्रधान दुबळा....दुसरा म्हणतो मला हे म्हणणारा कुठे गेला होता कंधार हाइजॅक च्या वेळी...
अरे बस करा रे ही फालतू गिरी...
च्यायला स्वतहाचे भांडं विसरून जरा देशकडे बघा जरा.
सल्यांनो तुम्ही देशाची दशा आधीच बिघडावून ठेवली आहे आणि आता काय बोंबाबोंब चालू आहे ?
काही लाज तरी ठेवा..माहिती आहे मला राजकारणात आल्या पासून ती सुद्धा विकली आहे.

लोकांची मतं मिळवण्यासाठी काय वाटेल ते करतील हे.
एक जन जय हो चे गाणे कॉपीराइट घेऊन वापरतो आणि दुसरा त्याची मोडतोड करून वापरतो.
ए. आर. रेहेमान ने ते गाणे तुमच्या सारख्या फालतू माणसांसाठी नाही लिहिले.

सगळीकडे साला ह्यांचाच प्रचार.
निवडून आल्यानंतर काय उखडून घेणार आहात तुम्ही ??
ह्यांच्या सारखे नालायक लोक अजुन पर्यंत पैदा झाले नव्हते कधी.
तो लालू इतका भ्रष्टाचार करून सुद्धा वर तोंड करून फिरतो आहे.
त्याचे काय उखडून घेतले तुम्ही सर्वांनी ?
संसद भवन वर हल्ला करणर्‍याचे काय उखडून घेतले तुम्ही ?
लांब कशाला, त्या कसब चे काय उखाडले तुम्ही ?
आम्ही भरलेल्या इनकम टॅक्स च्या जिवावर त्याला खाऊ पिवू घालताहेत ना ?
नीट काळजी घ्या हा त्याची...उगाच बिछार्याला सर्दि खोकला होईल.

त्या शरद पवारचा तर पंतप्रधान होण्यासाठी काय जीव चालला आहे काय माहिती.
रोज कुठल्या ना कुठल्या पक्षाचा उंबरठा झीजावत असतो तो.

हे साले निवडणूक आली की गरीबा सारखे मतं मागणार..आणि नंतर बॅंक भरणार.
बरं निवडणुकीला उभे कोण रहातात ?
गल्ली बोळतील ह्या आणि अशाच पक्षचे लोकं.
त्यांना मत नाही द्यायचे तर मग कुणाला द्यायचे मग आपण ??
कारण आपल्या समोर ऑप्षन असायला हवा ना ??

इथे लोक 2 वेळ चे जेवायचे कसे मॅनेज होईल ह्याचा विचार करतात आणि हे हारामखोर पैसे खातात.
बरं खातात तर खातात किती ??? काही लिमिट ??
ह्यांचा बॅंक बॅलेन्स ऐकून आपल्याला घाम फुटतो.
आमचा पगार कमी असला तरी साला इनकम टॅक्स किती भरावा लागेल ह्याच विचारणे घाम फुटतो...
आणि हे बघा...बिंदास डिक्लेर करतात...400-500 कोटी संपत्ती....

तुम्हाला माहिती नसेल कढचीत म्हणून सांगतो.
निवडणूक लढवतांना आपल्याकडे किती संपत्ती आहे त्याचा तपशिल द्यावा लागतो.
आता मला सांगा..एखाद्या कडे निवडणूक लढविण्या आधी 100 रुपये असतील आणि नंतर पुढे त्याच्या कडे 1000000 रुपये असतील तर साहजिक आहे की त्याचा 1 तर पगार इतका नाही.
म्हानुजे त्याने नक्की पैसे खाल्ले असणार...
ही गोष्ट माझ्या सारख्याला समजते पण त्या पक्षा मागे धावणार्या लोकांना समजत नाही.
तुम्हाला ह्या लोकांची गंमत सांगतो..पैशा साठी कुठल्या थराला जातील हे बघा...
आमच्या जुन्या घरच्या, जुन्या म्हणजे अगदी मी शाळेत असतांनाच्या, एरिया मधे एक नगर सेवक राहायचा.
त्याने निवडून आल्या नंतर इतका पैसा खाल्ला की त्याला तो नंतर लपावणे ही कठीण होऊन बसले.
बर इतका पैसा खाऊन त्याचे समाधान होईल तर तो राजकारणी कसला ?
5 वर्ष खा खा पैसा खाल्ला...पण नंतर पुढे आमचा वार्ड महिला आरक्षित झाला.
तर त्या थोर पुरुषाने त्याच्या बायकोला उभे केले.

ज्या बायकोला तो रोज तुडव तुडव तुडवायचा तिला जनतेची सेवा करायला उभे केले.
ज्या बाई चे घरात तिचा नवरा ऐकत नाही, ती जनतेची सेवा करणार का ?
आणि अशा बाई ला तिचा नवरा तिचा असा 1 तरी निर्णय घेऊ देईल का ?
अरे लाज वाटली पाहिजे .. बर आख्ख्या गावाला माहिती की हा बायको ला तुडवतो तरी त्याच्या प्रचाराला ही गर्दी.....
लोकं पण फार भिकारी बाबा...पैसे मिळाल्यास काय वाटेल ते करतील.

कॉंग्रेस ची एक आड पहिली ..
एक शेतकरी सांगत असतो...की कॉंग्रेस ने माझे कर्ज माफ केले म्हणून मी माझे मत त्यांनाच देणार.
अरे वा..छान आहे म्हणजे. कर्ज माफ करायला सोनिया बाई ला काय जमीन उपसावी लागली की डोंगर खोदावा लागला ?
नियम बनवणारे हेच आणि आमलत आणणारे हेच. मग काय ... नुसता नांगा नाच.


प्रत्येक पक्ष आपापले काही ना काही (कळीचे) मुद्धे घेऊन रिंगणात उतरला आहे.
मी काही कुन्या एका पक्षा ची बाजू घेणार नाही किवा मला तसे काही करण्यात काही हौस ही नाही.
पण मी तुम्हाला ह्या ब्लॉग द्वारे विनंती करू इच्छितो की प्लीज़...आता तरी सुधरा.
भ्रष्ट आणि नालायक लोकांना मतं देऊ नका.
मत देण्या आधी नेत्याच्या नावावर कुठला गुन्हा आहे की नाही ते जरूर पहा...कारण गुन्हेगार नेता मारझोड करण्या शिवाय काहीही करू शकत नाही.
आणि हो त्याचे शिक्षण पण पहा.

लक्षात ठेवा...हे लोक आपले मालक नाहीत...आपले सेवक (नोकर) आहेत.
आणि निवडून आपण त्याला आपल्या देशाची काहीतरी प्रगती होण्यासाठी देतो...निवडून आल्यावर भरपेट पैसे खाण्यासाठी नव्हे.

दरवेळी कुणीतरी निवडून येणार.
मग तो त्याचे घर प्रशस्त बांधणार...
आपल्या नातेवाईकांना मोठ्या पगाराच्या नोकर्‍या लावणार...
घरच्यांच्या नावावर लाखो-करोडो रुपये ठेवणार...
आलिशान गाडीतून फिरणार..
आपल्या सहकार्यांचे खिसे सुद्धा भरणार...
5 वर्षात 50 वर्षाची कमाई करणार..
आणि ऐशोारमात राहणार...

पण आपण ????
रोज सकाळी उठून तीच तीच महागाई वाढली ची तक्रार करणार ....
त्याच छप्पर नसलेल्या बस स्टॉप वर उभे राहणार...
हजारो खड्डे असलेल्या रस्त्यावरून चालणार...
आणि आता आहोत तसेच जगणार........
पण आपण जर आता नीट उमेदवारला वोट दिले तर ही परिस्थिती आपण बदलू शकतो..
सच्चे को चुनीये..अच्छे को चुनीये

तेव्हा विचार पक्का आणि भ्रष्ट नेत्याच्या तोंडावर बुक्का....

जय हिंद.