Tuesday, February 10, 2009

Life is calling....

आता गप्प बस...
मी मनाला पकडून सांगून टाकले आहे...
पण ते काही माझे ऐकत नाही...
सारखे सैरा वैरा धावत असते....लगाम नसलेल्या घोड्यसारखे...
जसा पाण्यात दगड टाकल्यावर पाणी स्थिर व्हायला खूप वेळ लागतो तसे काहीसे माझ्या मनाचे आहे...
एकदा विचार चक्र चालू झाले की मग ते बंद होणारच नाही...

आज माझी गाडी सिग्नल जवळ येऊन थांबली...
मी गाडीची काच खाली केली आणि सिग्नल कधी संपतो याची वाट पाहायला लागलो....
इतक्यात एक लहानसा मुलगा आणि बहुधा त्याची बहीण असावी अशी एक मुलगी माझ्या गाडी जवळ आले...
कपड्यांवरून ते गरीब वाटत होते...
घाई घाई ने त्यांनी गाडी पुसायला सुरवात केली....
हा प्रसंग काही नवीन नव्हता मला ... पण एरवी लक्ष देणारा मी, पण आज माझ्या मनात विचारांचे काहूर माजले...

कसे जगत् असतील हे ...???
आपल्या सारख्यांना जिथे इतका पगार असूनही पुरत नाही...आणि उरत नाही...
ह्या असल्या काळात ह्यांचे कसे भागत असेल ???
बरं ह्यांना जन्म देणारे आई वडील तरी ह्यांचा विचार करत असतील का ?
काय भवितव्य आहे ह्यांचे... ???
ठीक आहे आज दया आली म्हणा किवा काहीही म्हणा त्यांना आपण पैसे देणार...पण उद्याचे काय ??
शेवटी मी सुद्धा एक माणूस आहे..रोज रोज पैसे देणे परवडेल का मला ह्यांना.. ??


मी एकदा असेच एकदा एका गरीब माणसाला पैसे दिले होते..पण त्याने माझ्या समोर जाऊन बीडी विकत घेतली...
दुख: झाले मला पण एकदा पैसे दिले की त्याचा विचार नसतो करायचा..म्हणून मी विचार करायचा नाही असे ठरवले...
पण माझे मन ऐकेल तर शप्पत....




काय करता येईल आपल्याला ह्या लोकांसाठी ह्याच्याच विचारात आहे मी सध्या...
मला माहिती आहे की मी जास्त काही करू शकत नाही...पण थोडे तरी करू शकतो ना मी...
म्हणूनच मी तर ठरवले आहे की उगाच मंदिरात दान-धर्म करण्यापेक्षा मी ते पैसे गरीब लोकांसाठी वापरणार आहे...आणि सद्ध्या वापरत आहे...

मंदिरात दान-धर्म करण्यावर आपला विश्वास नाही...
त्यापेक्षा त्या मंदिराच्याच बाहेर बसलेल्या एखाद्या अपंग माणसाला जर थोडी मदत केली तरी देव प्रसन्न झाल्यावाचून राहणार नाही...

देवाला 5-10 रुपयांची माळ घालण्यापेक्षा तेच पैसे एखाद्या जिवंत माणसाचे कमीत कमी पोट भरू शकते...
ह्याचा अर्थ मी देवाला मानत नाही असे नाही...पण मी मानसांमधे देव पाहणारा माणूस आहे...

मित्रांनो आपल्यालाच काहीतरी केले पाहिजे ह्याच्यासाठी...
तुम्ही अगदी काही नाही तर एखाद्या गरीब मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घ्या...
त्याचा फक्त पुस्तकांचा खर्च उचला....बस बाकी काही मागने नाही....

जवळपासच्या शाळेत जा...तिथे प्रिन्सिपल ला भेटा..
ते संगतील की किती मुलांना मदतीची गरज आहे...त्यातील कमीत कमी एकाची जबाबदारी तरी घ्या...

तुम्हाला कदाचित ही गंमत वाटत असेल...पण हो तुम्ही हे करू शकता...
जो पर्यंत ह्या देशाचा तरुण जागा होत नाही तो पर्यंत ह्या देशात काही ही होऊ शकत नाही...
आणि 1-2 हजार रुपयांनी तुमचे काही काही होईल असे मला वाटत नाही...

मला काही पुढारी वैगेरे बनायचे नाहीए...पण फक्त मनात जे विचार चालू होते त्यांना मी एक वाट करून दिली आहे...
शेवटी पैसे आणि निर्णय तुमचाच आहे...

ह्या देशाचे काही ही होऊ शकत नाही असे आपण म्हणतो...पण मग आपण काय करतो त्यासाठी ??
कुठून तरी सुरवात करावी लागणार आहे आपल्याला... मग आज पासूनच का नको ???

3 comments:

Unknown said...

Hi,

The post represents your very good attitude towards poor people in india.

Let me tell you one thing, now a days many people have started doing some good things like -
i) Give some money to "Anath Ashram" for poor kids educaion.
ii) Take food for poor people & distribute it.
iii) Give the used cloths to poor people.
etc.

One more most important aspect about this is when you are doing all this dedicately it should be used properly not like as you mentioned "You gave money & the person had BIDI". So i thing first the attitude of poor people should aslo change then there are always many people to help them.

It always important that if you spend money it should be worth because you have earned it after all your efforts ... "Paise kahi tumchya Jhadala nahi lagala aahe"

Good Luck Arvind. Keeping posting.

Thanks,
Amit

Harshal said...

very good post !!!

you can help poor people... mostly cancer patient whose ads comes in news papers.

They r geneunie needy peoples.

I know we cant spend thousand/ lakh rs but whatever minimum you can spend .... you have to help them.

Jai said...

Once again you touched a nice Subject....
And I can say we are sharing same thoughts on this issue......
Definitely we people can do something for our society and infact we should do something.....

Once again Arvind Rocks.
Keep it up