Wednesday, February 11, 2009

आळस

लोकं हल्ली फार आळशी झाली आहेत...
काही विचारू नका..
माझा असाच एक मित्र (?) ..त्याला मी कौतुकने विचारले आजचा पेपर वाचला का ?
तर उत्तर मिळाले... " एखादा माणूस दे वाचायला..."

मी मनात म्हणालो "भाड मे जा साले..."
इतका आळस कसा असु शकतो हो माणसांना....?
मला खरच आश्चर्य वाटते ...
उद्या लग्नात "बायको ला माळ घालायला कंटाळा आला आहे ... " किंवा "हनिमून ला माझ्या ऐवजी तूच जा अरविंद, मला जाम कंटाळा आला आहे."
असे म्हटले नाही म्हणजे मिळवले...

नाही...माझी काही ही बळजबारी नाही....की पेपर वाचच म्हणून...
आणि असल्या लोकांसाठी तर पेपर वाले अजिबातच लिहीत नाही...
पण कंटाळा यायला काही लिमिट ???

कुणाला मदत करायला कंटाळा...
कुणाची विचार पूस करायला कंटाळा....
ऑफीस मधे जायला कंटाळा...
गेलेच तर काम करायला कंटाळा...
घरी आल्यावर बायको / घरची मंडळी काम सांगते म्हणून कंटाळा..
मित्रांना फोन करायला कंटाळा...
नुसता कंटाळा...

मला तर आनंद ह्या गोष्टी चा वाटतो की ...हे जर का स्वतंत्र पूर्व कळता असते तर देश कधीच स्वतंत्र झाला नसता...
मुलींसाठी 2 -3 तास वाया घालवणारी ही कार्टी आता बघा...
कसा पगार देते ह्यांना कंपनी काय माहीत...
तेव्हा नाही म्हणत का ? "कंटाळा आला आहे आज पगार नको..."

आपण बोम्ब मारतो अमुक एक काम करत नाही ... तमुक एक काम करत नाही...
पण तुम्ही जर स्वतहच आळशी असाल तर मग तुम्हाला कुणालाही बोलायचा अधिकार नाही मग. ..

आणि असल्या लोकांचे लग्न बर होते...
कशी काय निभावतात लग्न काय माहिती ही मंडळी ???

तुम्ही जर का सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचे फॅन असाल तर तुम्ही त्यांचे "कंटाळा..." ह्या विषयावरचे गाणे नक्की ऐकले असेल
"आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो ....
चाकोरीचे लिहून कागद साहीस पाठवतो ... !!!"

ह्या अशा लोकांसाठीच गाणे आहे ते......
मी नाही सांगू शकणार की माझ्या मनात किती चीड आहे असल्या लोका बद्दल...

पण मी मात्र ठरवले आहे की असल्या लोकांना दुरून डोंगर साजरे असे म्हणून दूरच ठेवावे...
कारण आळस हा एकद सौनसर्ग जान्य रोग आहे ..
आणि " ये बिमारी छुनेसे फेलती है..."

2 comments:

Harshal said...

khara hai tumhara mhanana !!!
maine comment de ne me jarabhi kantala nahi kiya hai

Arvind said...

अरे हर्षल तू आळशी नाहीए बाबा...