Monday, April 6, 2009

विचार बदला..

मी आज एका नातलगकडे गेलो होतो.
कसलिशी पूजा होती त्यांच्या कडे म्हणून मला बोलावण्यात आले होते.
मी गेलो.
त्यांचे घर एकदम प्रशस्त. टुमदार बंगलाच होता.
मी माझी गाडी पार्क केली तोच त्यांच्या घरातून धुराचा लोट च्या लोट बाहेर पडत होता.
मला थोडे टेन्षन आले पण पहिले तर काय ?? तिकडे होम चालू होता.

जवळपास 8-10 ब्राम्हण जोर जोरात मंत्र म्हणत होते.
मला सांगण्यात आले की ही पूजा 3 दिवस चालते.
मी म्हटले छान.
मग मी जाऊन एका कोपर्‍यात बसलो. मी त्यांची मजा पाहत होतो.
थोडे मंत्र म्हणून ब्राम्हण ऑर्डर द्यायचे, "1 मोठं भांड भरून शुद्ध तूप आणा..."
लगेच सगळीकडे धावाधाव...
सर्व जन तूप आणण्यासाठी पाळायचे.
मग नंतर फुलं...अगरबत्ती...काय वाटेल ते मागणी व्हयायची. आणि सर्व जन नुसती पळापळ करायचे.
मी मजा पाहत होतो.

इतक्यात एक भिकारी तिथे आला. साधारण 70-80 वय असेल त्याचे.
कपडे फटके घालणार्‍याला साधारण आपण भिकारी म्हणतो...म्हणून मी भिकारी म्हणालो.
एकदम सुकलेला होता तो. जणू काही जगण्याची इच्छा संपलेला.
त्याने पहिले की इथे पूजा चालू आहे म्हणून तो दारा बाहेर बसला काहीतर मिळेल ह्या आशेने.
त्याला घरातल्या काही मंडळींनी पहिले.
पुजेत कशाला हे विघ्न म्हणून त्यांनी त्याला हुसकावून लावले.
मला फार संताप आला.
तो बिचारा कसला विघ्न ???
तो तर तिथे शांत बसला होता. त्याने एका शब्दानेही काही अजुन मागितले सुद्धा नव्हते.
आणि त्या होमा मधे 2-4 बादल्या तूप ओतण्यापेक्षा त्या गरिबाला किमान एक पोळी तरी दिली असती.
जिवंत माणसाचे हाल करून देवाला पूजन्यात काय धर्म आहे ?
फक्त कुणी एक ब्राम्हण सांगतो म्हणून हांडे च्या हांडे वाया घालवणे मला पटत नाही.
इतका संताप संताप झाला म्हणून सांगू.
मी सरळ उठलो आणि पूजा आणि जेवण न करताच तिथून निघून गेलो.
मला नाही जमत असला भोंदु पणा.

तुम्हाला जर खरच देवाला प्रसन्न करायचे असेल तर असल्या पूजा करण्यापेक्षा सरळ जाऊन एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन त्याना काहीतरी करा.
एखाद्या शाळेत जाऊन गरीब मुलांना वह्या पुस्तक वाटा.
एखाद्याला रक्त दान करा...अशा आणि आणखी बर्‍याच प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकतात.

मला पर्वा नाही की तुम्ही काय म्हणाल ते.
I just don't care... because I know i am not talking something weird.
युगानुयूगे जे चालत आले आहे ते थोडे तरी बदलायला हवे आहे.
We can not follow each and everything blindly.

भगवान श्री कृष्ण सुद्धा सांगतात, की प्रत्येक माणसमधे देव आहे.
मग आपण त्याची पूजा का नाही करत ?
जे लोक फार देव देव करतात त्यांनी आयुष्यात नक्कीच फार पाप केलेले असते.
ते लपवण्यासाठी हे लोक देव देव करतात.
जर आपण स्वटहाशी प्रामाणिक राहिलो आणि दुसर्यांना त्रास होणार नाही असे वागलो तरी देव प्रसन्न होईल.
त्यासाठी 4-4 दिवस पूजा करण्यात काहीच अर्थ नाही.
आणि पूजा करून मन शुद्ध होत नसते. त्यासाठी विचार बद्लावे लागतात.
विचारांनी मन पवित्र असले की देव आपोआपच प्रसन्न होतो.
त्यासाठी 10-10 किलो तूप आणि उगाच पैसे वाया घालवायची गरज नाही.
तेव्हा समोरच्या माणसाला मदत करा...देव नक्की प्रसन्न होईल.

10 comments:

विशाखा said...
This comment has been removed by the author.
विशाखा said...

Tumche vichar 100% patle. Rabindranath Tagore yanchi ek kavita ithe far samarpak vatte:

Leave this chanting and singing and telling of beads!
Whom dost thou worship in this lonely dark corner of a temple with doors all shut?

Open thine eyes and see thy God is not before thee!
He is there where the tiller is tilling the hard ground
and where the pathmaker is breaking stones.

He is with them in sun and in shower,
and his garment is covered with dust.
Put off thy holy mantle and even like him come down on the dusty soil!

Deliverance?
Where is this deliverance to be found?
Our master himself has joyfully taken upon him the bonds of creation;
he is bound with us all for ever.

Come out of thy meditations and leave aside thy flowers and incense!
What harm is there if thy clothes become tattered and stained?
Meet him and stand by him in toil and in sweat of thy brow.

Anonymous said...

विचार चांगला आहे आणि पटला पण. तुम्हाला संताप आला म्हणून एक प्रश्न विचारावासा वाटतो? तुम्ही त्या भिका-यासाठी काय केले? एवढी तळमळ वाटणा-याने ५० रुपये तरी दिले असते त्याला.

बाल-सलोनी said...

तुमची तगमग रास्त आहे. यावर उपाय एकच आहे की महात्मा गांधींनी म्हटल्यानुसार सत्यनारायण सोडुन दरिद्रीनारायणाची सेवा केली पाहिजे आपण.

कोहम said...

brahman ha shabd bramhaN asa na lihita brahmaN asa lihava..apala vichar rastach ahe, pan brahmananna kashala dharevar dharata, yajmananna dhara...

Arvind said...

Dear Anonymous User,
Nav lihile aste tar jast maja aali asti..aani ho tumchya mahiti sathi sangto ki mi eka mulacha kharch uchalto aahe shalecha..

ugach faltu bolne mala jamat nahi.

Next time plz, post your name.

Arvind said...

kahi murkh lokan mule Anonymous comments band kele aahet.

Faltu comments taknaryanni ghari jave.

Unknown said...

Loka Sange Brahma dhyan, aapan korda pashan...

Mi ek madhyam vargiy manus aahe ....Mi bhikaryana madat karat nahi..mazya mate bhikaryana madat karun kahi saadya hot nahi..pan garju lokaana madat keli pahijet..maza sankalp aahe ki mi kamit kami 5 garib lokana ghare baandhun deil.

शब्दबंध said...

कृपया http://marathi-e-sabha.blogspot.com/ या ब्लॉगवरील नवीनतम पोस्ट वाचा. आपला सहभाग प्रार्थनीय आहे.

Waman Parulekar said...

mi bal saloni chya comment shi purnpane sahmat aahe...

gorgoribanchi seva karane hach khara dharm...

manavatepeksha konatahi dharm motha nahi...

- Waman Parulekar