Monday, February 2, 2009

दोस्ती....

काल मी असाच ऑफीस मधे बसलो होतो...नेहमीसारखा विचार करत...आणि कोडिंग चे प्रॉब्लेम सॉल्व करत..
इतक्यात एक मित्र ऑनलाइन भेटला..म्हणाला अरविंद हे गाणे ऐकले आहे का ??
मी म्हणालो कुठले बुवा... तो बोलला -- "तोबा तेरा जलवा, तोबा तेरा प्यार...तेरा एमोसिनल अत्याचार...."
मी म्हणालो नाही बाबा..
तो म्हणाला जरूर ऐक एकदम झाक्कस आहे... मी ही विचार करून खूप वैतगलो होतो, म्हनून
म्हटले चला मस्त गाणे ऐकून मूड बनवू...
मग मी ते गाणे घाई घाईने डाउनलोड केले...आणि ऐकले ....
साला असला संताप झाला म्हणून सांगू...एकदम बकवास गाणे होते ते...
हे बघा पोरं असं काहीतरी करतात...पण मित्र आहे ना काय करणार ..??? पण नंतर जेव्हा मी ते गाणं खूप वेळा ऐकले तेव्हा तेच डोक्यात बसले...आणि आता मी सुद्धा दुसर्यांना हेच गाणे रेफर करतो आहे... हा हा हा हा

पण काहीही म्हणा...मित्र असले की बरं वाटतं....
पोरं त्रास देतात .. पण मजा वाटते...आणि ती नसली की आयुष्य भकास वाटते...

अर्ज किया है...

"राह चलते को राह भुलाते है दोस्त...
सोडा बोलके दारू पिलाते है दोस्त....
कूछ भी करलो बोहोत पकाते है दोस्त...
लेकिन याद साले बोहोत आते है दोस्त.... "


कॉलेज मधले आयुष्य मस्त होते...
हसा खेळा...लाइन मारा... टाइम पास करा... घरी जा ... झोपा...मग कुणीतर मित्र घरी येतो..तो लात घालून उठवतो...म्हणतो चाल...
आपण विचारायचे नाही...गप्प रस्ता पकडायचा...तो कट्यावर नेतो...
मग तिकडे कुठल्याशा पोरीचे विषय निघतात...सर्वे जन मनसोक्त तोंड सुख घेतात...आणि पुन्हा रात्री जेवण झाल्यावर सुटटा मारणे के लिये कट्टा....

लोक म्हणतात आजची पोरं वाया गेली...
पण ते पॉज़िटिव विचार का करत नाही..
कुठल्याही कट्यावर जा...तिकडे एका काडेपेटीच्या कडीत कमीत कमी 10 सिगरेट सहज पेट्टात...इतकी बचत करत असेल का कुणी जगात..??? सांगा ???

सॉलिड ऐश होती..त्या वेळी..

सुदैवाने मला खूप छान मित्र भेटले... (ते सुद्धा बहुधा हेच म्हणत असावे ... हा हा हा )
नासिकमधे ... पुण्यात...आणि मुंबई मधे सुद्धा...

सर्वांची फार आठवण येते पण काही फोन करणे जमत नाही...
कारण जग झोपते तेव्हा अरविंद जागा असतो आणि अरविंद जागा असतो तेव्हा जग झोपते.... असा काहीसा उल्टा प्रकार आहे....
म्हणून मुद्दाम मी ही पोस्ट लिहायला घेतली...

काही मित्र माझे असे आहेत की ज्यांच्या तोंडून भेटल्यावर शिव्या ऐकल्यशिवय मला दिवस जातच नाही...
आणि काहींना शिव्या दिल्याशिवाय राहावत नाही...

मित्र होतात सुद्धा एकदम पटकन....
त्याला काही रुल नाही...आता माझेच बघा ना...
कॉलेज च्या पहिल्या दिवशी मी ज्याच्याशी मारामारी केली तोच माझा एकदम जिगरी मित्र होईल असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते मला....

कॉलेज मधे असतांना शिकलो होतो....
जर
अ = ब आणि ब = क
तर

अ = क

हे मी बर्‍याच वेळा दोस्ती मधे अनुभवले आहे...

दोस्ती चा महिमा फार थोर आहे..हे काय मी सांगायला नकोच...
जय आणि वीरू ने ते आधीच सिद्ध केले आहे...
उगाच नाही त्यांनी गाडीचे पेट्रोल वाया घालवुन " ये दोस्ती हम नाही छोडें गे.... " गाणे म्हटले...

मैत्री तून अनेक नाती निघतात...
अगदी अचानक पणे...
कधी भाऊ .. कधी बहीण ( हे सध्या तरी क्वचितच ) ..कधी प्रेमिका (हे जरा जास्त च) ..कधी प्रेमी....
अगदी माझे लग्न झाले ती माझी बायको सुद्दा माझी कित्येक वर्ष मैत्रीण होती...

मला फक्त काही लोकांचा राग येतो ...
उदा. स्मिता पाटील, राज कपूर...इ.इ.
ह्यांनी काहीशा प्रमाणात दोस्ती ला काळिमा फसला आहे...
कसा ???
आहो तिचे ते गाणे नाही का ???

"दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है...
उमर भर का गम हमे इनाम दिया है... "

कुठला गम दिला काय माहीत...बहुतेक फाविकोल दिला असेल...

आणि राज कपूर चे "दोस्त दोस्त ना राहा..."

पण आजही दिल चाहता है चे गाणे ऐकले की मस्त वाटते...
आणि आठवतो तो मैत्रीतला प्रवास...
सहज...सुखकर...हळवा..निस्वारथी....प्रेमळ...स्वछन्दि...भाऊूक आणि हवा हवा सा....

Ghajini...डोक्याला ताप...

काल पर्यंत मी फार खुश होतो ... एकदम टेन्षन फ्री
पण मला काल काय अचानक अवदासा आठवली काय माहिती...
आणि मी "गजिनी" पहिला.... अरे हाड...
च्यायला डोक्याला ताप .. एकदम डोके आउट झाले...
तुमच्या पैकी कुणाला हा पिक्चर आवडला असेल तर मी तुमचा जाहीर मुका घ्यायला तैयार आहे...

किती फालतू सीन्स आहेत पिक्चर मधे काय सांगू तुम्हाला...
तरी मला कितीतरी लोक सांगत होते की तो पिक्चर बघ म्हणून...
पण सहसा मी जास्त फेमस झालेले पिक्चर पहाणे टाळतो...कारण माझी चाय्स थोडी वेगळी आहे...

पहिली गोष्ट ... आमिर खान एका मोठ्या कंपनी चा चेर्मन असून सुद्दा तो कसा दिसतो हे कुणाला ही ठाऊक नाही हेगणित काही मला झेपले नाही...
आणि कुठल्याही कंपनी चा चैयरमॅन एखाद्या सेल्समन सारखा लोकांच्या दारी जातो --- ते ही फक्त एक होर्डिंगसाठी ????
च्यायला आमच्या इथला किराणावाला सुद्धा असे काही करणार नाही ...

दुसरी गोष्ट -- तो मूरखा सारखा तिला सांगायला ( झापायला ) जातो आणि चक्क प्रेमात वैगेरे पडून येतो... ??
पडतो तर पडतो आपल्या बपाचे काय जाते ?? पण मग ह्या गाढवला तिला इतके सुद्धा सांगता येत नाही की "हा मैही हु वो पागल संजय सिंघहनिया जो होर्डिंग के काम के लिये आया था.... "
मी केव्हा पासून बघत होतो की हा साला तिला केव्हा सांगणार की मीच तो आहे...
मार डबल डेकर च्या वरच्या सीट वर बसून सांगतो की "अगर उसने प्यार के लिये हा कर दि तो मै उसको बता डुंगाके मै कौन हु ... "
अरे मग साल्या सांग की...इंटर्वल होऊन पिक्चर सुद्धा संपतो पण ह्याला काही सांगता येत नाही...
अगदी प्रेक्षकांना सुद्धा समजते की हाच तो..पण कल्पनाला समजतच नाही...वाह रे मुहोब्बत...

इतकी बावळट स्टोरी लिहिली आहे लिहिणार्यानी की जाऊन थियेटर मधला पडदा ब्लेड ने फाडून टाकावा इतकासंताप होतो ...

मग पुढे हे सांगायची काय गरज होती की "माझ्या नसलेल्या आईचे ऑपरेशन करायचे आहे..."...
गॅप सांगायचे ना की मी मीटिंग ला चाललो आहे...पण तो असे सांगेल तर शप्पथ...
कारण हीरो चे कॅरक्टर लिहितांना त्याच्यात खचून मूर्खपणा भरला आहे...

मग ती बावळट हीरोइन पूर्ण दिवस इकडे तिकडे टँगळ मंगळ करते आणि रात्री 1 वाजता त्याला भेटायलाबोलावटे...पैसे द्यायला..
तो ही आपल्याच पठडीतला मस्त पैसे घेतो...आणि निघून जातो.. आहे की नाही गंमत...

मग पुढे ट्रेन मधला एकदम फालतू किस्सा ... ट्रेन ला डबे 3 ..
एका डब्यात फक्त ही हेरॉईन .. दुस-यात पळवून आणलेल्या पोरी आणि तिसर्या मधे हेरॉईन ची मदत करण्यासाठीडिरेक्टोरे ने पाठवले ले सैनिक-- जे सध्या बॉर्डर वर नसतात ...तर ट्रेन मधे पोरींची कामे करतात.... ; अरेहाड....काही पण..

आता मात्र माझा संताप अनावर झाला...
मी थियेटर मधून उठून डिरेकटर च्या घरीच जाणार होतो...पण बायकोने आडवले म्हणूननाही गेलो ....

पुढे गजिनी नावाचे एकदम कॉमेडी कॅरक्टर...
नाहीतरी आपल्या Bollywood मधे व्हिलन बावळट दाखवावेच लागतात नाहीतर पिक्चर चालत नाही...
जर व्हिलन हुशार दाखवले तर हीरो आणि हेरॉईन चे लग्न कसे होईल मग ???
क्लाइमॅक्स मधे व्हिलन उगाच बडबड करण्यापेक्षा गोळी नाही घालणार का हीरो च्या ?

तर हा गजिनी..स्वताहा जाऊन हेरॉईन ला "हिरानंदाणी " मधे मारतो...
आहो हिरानंदाणी मधे सेक्यूरिटी असते... हे आम्हाला माहिती आहे..
नवीन आलेल्या प्रत्येक माणसाची नोंद गेट वर होतेच...जाऊद्या बहुतेक गजिनी कडे गेट पास असेल...

पुढचा सीन...हेरॉईन च्या घरात गुंड .. मग हा मोबाइल गाडीत मधे विसरतो... वा वा...
म्हणजे हेरॉईन ला मारायचे आहे ना मग तिला डाइरेक्टर कसा ही मारणारच ... आपण काय हीरो सुद्धा तिला वाचवूशकत नाही मग...

बर दोघांचे खून होतात...सुरवातीला ही एका इनस्पेक्टर चा खून होतो ..पण त्याची चौकशी वैगेरे होत नाही...
आहो गुंड मेल्यावर चौकशी होते मग पोलीस मेल्यावर नको व्हायला का ?

मधे जिया खान ला घ्यायचे काही कारण नव्हते...
तिचा आणि आक्टिंग चा काही एक संबंध नाही हो... आम्ही पहिले आहे तिला "निशब्ध" ह्या सिनिमा मधे...
तिच्या गावात आक्टिंग क्लास नव्हते मग तिला आक्टिंग कधी आणि कशी येणार ??
तिला बापडी ला देह प्रदर्शन करायला राहू देत बाकी...तिला उगाच त्रास देऊ नका...


शेवटी कसेही करून हीरो गजिनी ला मारतोच ...
आहो म्हणजे काय ? डाइरेक्टर ने त्याला त्याचेच तर पैसे दिले आहेत ना...

गजिनी ला जर हीरो ने इंटर्वल च्या आधी मारले असते तर हा पिक्चर जास्त चालला असता...
आणि लोकांचा वेळ सुद्धा वाचला असता...

डाइरेक्टर साठी मला एक सल्ला द्यावसा वाटतो... "असले पिक्चर प्रथम आपल्या गल्लीतल्या लोकांना दाखव... कमीत कमी त्यांना स्क्रिप्ट तरी वाचायला दे ... मग ते संगतिल की हा पिक्चर चांगला की वाईट... ते ... "

आणि एक प्रश्न मनात येतो तो हा की --- "हा पिक्चर चालला कसा ??? फक्त आमिर च्या बॉडी मुळे की काय ???? "

च्यायला डोक्याला ताप.....