Wednesday, February 11, 2009

ऑफीस मधला धिंगाणा ...( Part 1)

वेळ = रात्री 12-1 ची ...
ठिकाण = माझी पुर्वी ची कंपनी...
दृष्य = मी आणि माझे टीम मेट्स काम करतो आहोत...

आमची त्या दिवशी फारच लागलेली होती...
नाही दोष आमचा नव्हता पण काय करणार नेहमी प्रमाणे आमची च मारली जाणार होती...
म्हणून काम करत बसावे लागले...
सर्वांच्या घरून धडा-धड फोन येत होते...कधी घरी येणार म्हणून...
पण काम झाल्याशिवाय घरी गेलो असतो तर प्रॉजेक्ट मॅनेजर ने दुसर्या दिवशी धिंगाणा केला असता...
म्हणून झक मारत थांबावे लागले...

हा तर रात्र बरीच झाली होती...
आम्ही जाम वैतागलो होतो...
दुसरी टीम जी आम्हाला सपोर्ट करत होती, तिचे सर्व मेंबर गुल झाले....
आणि आम्ही गाढवा सारखे काम करत बसलो होतो...
जशी काही सगळी खाज आम्हालाच होती...


कंपनी एकदम बकवास की जिथे साधी चहा ची सुद्धा सोय नाही...
सतराशे - साठ नियम...
हे करू नका ..ते करू नका...
साधे बाहेर गेलो आम्ही तरी 100 वेळा ऐकवणार...
तिकडे बॉस पेक्षा सेक्यूरिटीलाच जास्त अधिकार...
हे का करता..ते का करता...

एकदा मी, माझी टीम आणि माझा प्रॉजेक्ट मॅनेजर जेवायला बाहेर गेलो होतो..
तर सेक्यूरिटी सरळ प्रॉजेक्ट मॅनेजर लाच आडवायला निघाला...ईतना डेर कैसे हुआ म्हणून...
असली चिप कंपनी... ( तिच्या बद्दल कधीतरी लिहीन आणखी सविस्तर)

च्यायला .. इतक्यात माझ्या एका मित्रचे डोके सटके..
तो तडा तडा बाहेर गेला...
आणि मोबाइल मधे घेऊन आला...(मोबाइल सुद्धा allowed नव्हता ऑफीस मधे ... आता काय सांगणार आमच्या व्यथा .. )
बस बोहोत हुआ...अभी भाड मे गयी कंपनी ...
असे म्हणून त्याने " आपडी पोड पोड..." गाणे लावले..

मी त्या कंपनी मधे सीनियर होतो..
पोरांना मी खूप समजवले...पण आम्ही सर्वच वैतगलो होतो...
मग काय .. पाहता पाहता एक एक जन उठला...
आणि थोड्या वेळाने...आम्ही सर्व जणांनी त्या गाण्यावर मनसोक्त डॉन्स केला...

फोटो काढले...
काय वाट्टेल ते केले...
मज्जा आली...
नियम मोडताना इतकी मज्जा आयुष्यात कधीही आली नव्हती ...
शिवाजी महाराजांना एखादा गड जिंकल्यावर जितका आनंद झाला असेल तितका आनंद आजही ते फोटो पाहिल्यावर आम्हा सर्वांना होतो..

मॅनेज्मेंट ला शिव्या दिल्या...
प्रॉजेक्ट मॅनेजर ला सुद्धा शिव्या दिल्या...साला एवढ्या थंडी मधे तो मस्त गोधडी मधे झोपला असेल आणि आम्ही ऑफीस मधे मारत बसलो होतो...
त्या दिवशी खरच इतके मस्त वातावरण तैयार झाले होते की कुणालाही घरी जावेसे वाटत नव्हते...
सर्व जन जाम खुश होते...
आम्ही कंपनी चे नियम धाब्यावर बसवले होते...
आणि इथूनच आमच्या क्रांतीकारी लढ्याची सुरवात झाली होती...
त्या दिवशी अशा प्रकारे दिवाळी साजरी केली....
जय भवानी .. जय शिवाजी म्हणत आम्ही शेवटी ऑफीस सोडले...

आळस

लोकं हल्ली फार आळशी झाली आहेत...
काही विचारू नका..
माझा असाच एक मित्र (?) ..त्याला मी कौतुकने विचारले आजचा पेपर वाचला का ?
तर उत्तर मिळाले... " एखादा माणूस दे वाचायला..."

मी मनात म्हणालो "भाड मे जा साले..."
इतका आळस कसा असु शकतो हो माणसांना....?
मला खरच आश्चर्य वाटते ...
उद्या लग्नात "बायको ला माळ घालायला कंटाळा आला आहे ... " किंवा "हनिमून ला माझ्या ऐवजी तूच जा अरविंद, मला जाम कंटाळा आला आहे."
असे म्हटले नाही म्हणजे मिळवले...

नाही...माझी काही ही बळजबारी नाही....की पेपर वाचच म्हणून...
आणि असल्या लोकांसाठी तर पेपर वाले अजिबातच लिहीत नाही...
पण कंटाळा यायला काही लिमिट ???

कुणाला मदत करायला कंटाळा...
कुणाची विचार पूस करायला कंटाळा....
ऑफीस मधे जायला कंटाळा...
गेलेच तर काम करायला कंटाळा...
घरी आल्यावर बायको / घरची मंडळी काम सांगते म्हणून कंटाळा..
मित्रांना फोन करायला कंटाळा...
नुसता कंटाळा...

मला तर आनंद ह्या गोष्टी चा वाटतो की ...हे जर का स्वतंत्र पूर्व कळता असते तर देश कधीच स्वतंत्र झाला नसता...
मुलींसाठी 2 -3 तास वाया घालवणारी ही कार्टी आता बघा...
कसा पगार देते ह्यांना कंपनी काय माहीत...
तेव्हा नाही म्हणत का ? "कंटाळा आला आहे आज पगार नको..."

आपण बोम्ब मारतो अमुक एक काम करत नाही ... तमुक एक काम करत नाही...
पण तुम्ही जर स्वतहच आळशी असाल तर मग तुम्हाला कुणालाही बोलायचा अधिकार नाही मग. ..

आणि असल्या लोकांचे लग्न बर होते...
कशी काय निभावतात लग्न काय माहिती ही मंडळी ???

तुम्ही जर का सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचे फॅन असाल तर तुम्ही त्यांचे "कंटाळा..." ह्या विषयावरचे गाणे नक्की ऐकले असेल
"आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो ....
चाकोरीचे लिहून कागद साहीस पाठवतो ... !!!"

ह्या अशा लोकांसाठीच गाणे आहे ते......
मी नाही सांगू शकणार की माझ्या मनात किती चीड आहे असल्या लोका बद्दल...

पण मी मात्र ठरवले आहे की असल्या लोकांना दुरून डोंगर साजरे असे म्हणून दूरच ठेवावे...
कारण आळस हा एकद सौनसर्ग जान्य रोग आहे ..
आणि " ये बिमारी छुनेसे फेलती है..."