Tuesday, March 31, 2009

Ajay Atul : My Fav Marathi Musicians

अजय - आज आपण दोघंही संगीतकारांची जोडी म्हणून लोकप्रिय झालो आहोत; पण एकेकाळी तुला अभिनयामध्ये आवड होती ना?
अतुल - आवड होती म्हणण्यापेक्षा मला माहीत होतं, की मला कोणत्या गोष्टीत गती आहे. एखाद्या गोष्टीत यश मिळालं, कोणी पाठ थोपटली, की मला त्या गोष्टीची प्रेरणा मिळायची. "सकाळ' वर्तमानपत्राच्या नाट्यवाचन स्पर्धेत "हिमशुरू' नावाच्या एकांकिकेचं मी वाचन केलं होतं. तेव्हा वृत्तपत्रात माझं नाव झळकलेलं पाहून मी कमालीचा खूश झालो होतो. त्यानंतर मला अभिनयाचं बक्षीसही मिळालं होतं. आपण अनेक गोष्टी कराव्यात, असं मला वाटायचं. अभिनय करावा असं वाटायचं आणि अजूनही वाटतं.

अजय - म्हणजे आता तू अभिनयही करणार आहेस की काय?
अतुल - अरे, अभिनयच काय; पण दिग्दर्शनही करायची माझी इच्छा आहे. पण संगीतकाराच्या कामातून वेळ मिळायला हवा ना!

अजय - मला आठवतंय, तुला शाळेत असताना गणित, भूगोल हे विषय आवडत नव्हते, बरोबर ना?
अतुल - अजिबातच आवडत नव्हते ते विषय मला. खारे वारे, मतलई वारे शिकून करायचंय काय असं मला वाटायचं. गणिताचा तर मला कंटाळाच यायचा. पण बॅंड पथकात तर मी कायम पुढे असायचो. मराठी कविता आणि इतिहास या गोष्टींची मला खूप आवड होती. मी रोज शाळेतली प्रार्थना म्हणायचो.

अजय - लहानपणी तू तर खूपच लुकडा होतास; मग तुला एनसीसीमध्ये घेतलंच कसं?
अतुल - त्याचं एकमेव कारण म्हणजे म्युझिक. माझा आवाज एकदम पहाडी होता. ऑडिशनला "हवासिंग' नावाचे एक मेजर आले होते. त्यांनी तर सर्वांची ऑडिशन घेतली आणि माझा पहाडी आवाज पाहून ते प्रचंड खूश झाले होते. अशा रीतीने माझी निवड झाली.

अजय - एनसीसीमध्ये गेल्यानंतर तुझ्या बारकुडेपणामुळे तुला काही गमतीदार अनुभव आले का?
अतुल - अरे, मी खूप बारीक असल्यानं माझ्या मापाचे बूटच मिळत नव्हते. पी.टी.च्या शूजवर मी परेड करायचो. शेवटी माझ्या मापाचा ड्रेस मी स्वतः शिवला होता. त्या पन्नास जणांच्या विद्यार्थी समूहात माझा ड्रेस वेगळा दिसायचा. पण माझ्या "डेडीकेशन' या प्लस पॉईंटमुळे आणि ऑर्डर देण्याच्या पद्धतीमुळे मला "सार्जंट'चं पद मिळालं आणि मी पूर्ण एनसीसीमय झालो.

अजय - दहावीचं वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातलं महत्त्वाचं वर्ष असतं आणि तू प्रिलीमला गणिताच्या पेपरात चक्क चित्रं काढली होतीस ना?
अतुल - गणित म्हटलं की माझा छत्तीसचा आकडा. ते आकडे बघून मला झोप यायची. प्रिलीमला गणिताच्या पेपरातलं मला काहीच येत नव्हतं. मी चित्रं काढून ठेवली पेपरात. आई पेपरचे मार्क विचारायची. तेव्हा मी खोटं सांगितलं, की मी पेपर संपूर्ण सोडवलाय; पण सरांनीच गुण दिले नाहीत. तेव्हा आई शाळेत आली. सरांनी तो चित्रमय गणिताचा पेपर आईला दाखवला. मग काय, घरी आल्यावर बेदम मार खावा लागला.

अजय - अतुल, हा जरा अतीच बेशिस्तपणा झाला. पण मग तुझ्या आयुष्याला शिस्त लागली की नाही?
अतुल - मी शाळेत व्रात्य होतो हे खरं आहे. पण मला शिस्त लावण्यात वाटा आहे तो एनसीसीचा. मी सार्जंट झालो, तेव्हा मला इतर मुलं "फॉलो' करणार याची जाणीव झाली आणि मग हळूहळू तो व्रात्यपणा कमी होत गेला.

अजय - तू आयुष्यात पतंग कधीच उडवला नाहीस; पण विमान उडवलं होतंस ना?
अतुल - आपल्या शाळेचा सुवर्णमहोत्सव होता, तेव्हाची गोष्ट आहे. त्यानिमित्तानं पॅरा-ग्लायडिंगच्या प्रात्यक्षिकांसाठी माझी निवड झाली होती. माझं पायलट होण्याचं स्वप्न होतं. त्या प्रात्यक्षिकांमुळे मिनी-पायलट होण्याचं माझं स्वप्न साकार झालं.

अजय - पण विमानाचं तुला अजूनही आकर्षण आहे ना?
अतुल - हो तर! पण आता ते आकर्षण मी संगणकाच्या माध्यमातून जपत असतो. विमानं मला कायमच आकर्षित करतात. संगणकावर "हाय सिमिलेटर' हा गेम मी तासन्‌ तास खेळत असतो.

अजय - आपण या इंडस्ट्रीत यायला नेमकं काय केलं, आठवतं?
अतुल - अजय, आपल्या वडिलांची सरकारी नोकरी असल्यामुळे बदल्या व्हायच्या. त्यामुळे शिरूर, राजगुरुनगर असा आपला प्रवास सुरू होता. मला आठवतंय, मी नववी-दहावीत असताना "पाहिजेत' या शीर्षकाखाली "कलाकार पाहिजेत' या आशयाच्या जाहिराती खूप यायच्या. मी तिथे जायचो; पण मग तिथे गेल्यावर लक्षात यायचं, की पेपरात दिलेले ते सर्व पत्ते खोटे असायचे. पुण्याला फिल्म इन्स्टिट्यूट कुठे आहे हे पाहायला आईनं मला त्याकाळी एकट्याला काही पैसे देऊन पाठवलं आणि जवळ जवळ दोन तास मी तो पत्ता शोधत बसलो होतो.

अजय - पण मग नेमकी करिअरची दिशा कशी सापडली?
अतुल - जेव्हा आपण पुण्यात आलो, तेव्हा तिथल्या स्थानिक ग्रुपबरोबर लोककलेच्या कार्यक्रमात वादक, गायक, नर्तक म्हणून सहभागी झालो. काही ना काहीतरी ऍक्‍टिव्हिटी अशा कार्यक्रमातून सुरू राहिली. मग ओळखी वाढल्या आणि संगीत क्षेत्र हे करिअरसाठी योग्य असल्याची जाणीव झाली.

अजय - आपल्या पहिल्यावहिल्या रेकॉर्डिंगबद्दल सांग.
अतुल - तेव्हा तर स्टुडिओ कसा असतो, हेडफोन्स का लावतात, रेकॉर्डिंग कसं होतं हेदेखील माहीत नव्हतं. बारा गाण्यांना आपण दोघांनी संगीत दिलं होतं. फक्त चार हजार रुपये बजेट होतं. स्टुडिओची रचना वगैरे या गोष्टीही नवीन होत्या. ते रेकॉर्डिंग झाल्यावर आपल्या दोघांच्याही डोळ्यांत पाणी आलं होतं.

अजय - आपण पहिला की-बोर्ड खरेदी केला, तेव्हाची आठवण लक्षात आहे का?
अतुल - आपल्याकडे तेव्हा कुठलंच स्वतःच्या मालकीचं वाद्य नव्हतं. की-बोर्डसुद्धा आम्ही भाड्यानं आणत होतो. शेवटी आपण ठरवलं होतं, की स्वतःचा की-बोर्ड खरेदी करूया. पण त्या की-बोर्डची किंमत होती, "एक लाख पाच हजार' रुपये. काही जणांकडून पैसे उसने घेतले, लोन काढलं. पहिल्यांदा आपण "एक लाख' रुपये प्रत्यक्षात बघितले होते. मुंबईला आपण सर्व तो की-बोर्ड खरेदी करायला गेलो होतो, हे कसं विसरू शकेन मी?
अजय - पण एक प्रश्‍न पडतोय, की आपल्याला परवडतं ते घेण्यापेक्षा जगातलं सर्वोत्तम जे, तेच खरेदी करावं, असं तुला का वाटतं?
अतुल - प्रवाहात जे चालू आहे, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं, असं मला वाटतं. सगळं दर्जाचंच असावं, हा माझा आग्रह असतो. कारण प्रगत तंत्रज्ञान खरेदी केलं की त्याचे फायदेही निश्‍चितच जास्त असतात. कुठल्याही गोष्टीतला "पायंडा' हा आपल्यापासून सुरू व्हावा, असं मला वाटतं. आपण चाकोरीबद्ध विचार करण्यापेक्षा चाकोरीबाहेरचा विचार करणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं.

अजय - तुझी मैत्री तुझ्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या माणसांशी पटकन्‌ कशी काय होते?
अतुल - ज्यांच्याकडून मला काही ना काही तरी चांगलं शिकायला मिळतं, अशांबरोबर मैत्री करायला मला आवडते. माझा स्वभाव एखाद्याशी पटकन्‌ मैत्री करणारा आहे. मला इतरांचे अनुभव, विचार ऐकायला आवडतात.

अजय - पुणे-मुंबई ए.सी. बसनं प्रवास करताना तिकीट खरेदी करूनही तू ड्रायव्हरच्या शेजारी का बसायचास?
अतुल - मला गाड्यांची खूप क्रेझ आहे, ड्रायव्हिंगची क्रेझ आहे. मला ड्रायव्हिंग उत्तम येऊ शकतं, याची जाणीव मला कधीच झाली होती. पुणे-मुंबई प्रवासात माझी ड्रायव्हरशी पटकन दोस्ती होऊन जायची. गाड्यांचं मला खूप आकर्षण आहे. माझ्या आयुष्यातील "टॉप फाइव्ह' गोष्टीत कार्सना एक स्थान आहेच.

अजय - तुला वाचनाची आवड कशी लागली?
अतुल - याचं सर्व श्रेय आपल्या आईला आहे. वाचनाची सवय मला आईनंच लावली. लायब्ररीतून माझ्याकरिता ती छान-छान पुस्तकं घेऊन यायची. बसल्या-बसल्या ज्ञानाचा प्रचंड खजिना देतात ती ही पुस्तकं! आजही प्रवास करताना चार-पाच पुस्तकं मी जवळ ठेवतोच.

अजय - तुझे आवडते लेखक?
अतुल - पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार, गो. नी. दांडेकर, श्री. ना. पेंडसे आणि विश्‍वास पाटील.

अजय - विश्‍वास पाटील यांच्याबरोबर तू रायगडावर गेला होतास ना?
अतुल - तो अनुभव तर अविस्मरणीयच आहे. आपण महाडला एका हॉटेलात उतरलो होतो. विश्‍वास पाटील पहाटे आपल्याला उठवायला आले आणि म्हणाले, "काय, रायगड चढायचाय ना?' मनात प्रचंड उत्साह संचारला होता. रायगडच्या पायथ्यापासून ते वरपर्यंत जाताना विश्‍वास पाटील प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या आठवणी जागृत करीत होते. रायगडाबद्दल शाळेत जे वाचलं होतं, ते आठवलं. लहानपणी रायगड पहिला होता ते आठवलं आणि आता सर्व इतिहास जागृत झाल्यासारखं वाटलं आणि गडावर पोचल्यावर तर काय, राज ठाकरे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या "ई टीव्ही'साठी चित्रीत होणाऱ्या सुसंवादातून आनंददायी पर्वणीच अनुभवली होती.

अजय - अजय-अतुल हे नाव भविष्यात कुठे असावं, असं तुला वाटतं?
अतुल - आपण सतराशे साठ गोष्टी करण्यापेक्षा तेवढ्याच गोष्टी करूया की ज्या त्या क्षेत्रातील "माइल स्टोन' ठरतील. पाचशे चित्रपटांना संगीत द्यायचं आणि त्यातले पन्नासच लोकांनी लक्षात ठेवायचे, अशी आपली ओळख कधीच नसावी. त्यापेक्षा भलेही आपण पन्नासच चित्रपट करू; पण तो प्रत्येक चित्रपट लोकांच्या लक्षात राहणारा ठरेल. फक्त संगीतच नव्हे; तर ज्या-ज्या क्षेत्रात आपण जी जी कामगिरी करू, ती लोकांच्या कायम स्मरणात राहायला हवी.

अतुल - अजय, लहानपणी तू स्वतःला अंडर-एस्टीमेट का करायचास?
अजय - मी पटकन्‌ खूप गप्पा मारत नाही. लहानपणी माझ्यात आत्मविश्‍वासाचा थोडा अभाव होता. अमुक एक गोष्ट मला जमेल का, "हे नको रे, ते नको रे' असा माझा ऍटिट्यूड होता. शिवाय मी धाकटा असल्यानं मला ओरडा खायला लागायचा. मग मी शांतच होत गेलो.

अतुल - शांत होत गेलास की स्वतःला शोधत बसला होतास?
अजय - मी खरं तर त्या वेळी "बंद'च पडलो होतो, असं म्हण. कारण "शोधणे' ही एक प्रक्रिया आहे. ती सुरू व्हायला एक "कीक' लागते. स्वतःला सापडण्याचा एक दिव्य क्षण असतो. तो क्षण यायला नेमकी वेळ यावी लागते.

अतुल - तुझ्या आयुष्यातला तो क्षण नेमका आला कधी?
अजय - तो क्षण मी शोधू शकलो तो म्युझिकमुळेच. संगीतकलेनंच मला योग्य तो आधार दिला. पुण्याला आल्यावर तो सूर खऱ्या अर्थानं सापडला. मग संधी मिळत गेली. माझ्यातला "मी' मला सापडला. मग मागे वळून कधी पाहावंच लागलं नाही.

अतुल - तुझ्या जिवावर बेतलेल्या प्रसंगातून आयुष्याकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन कसा बदलला?
अजय - असं तीन वेळा घडलंय. मी अगदी तान्हं बाळ असताना खूप आजारी होतो तेव्हाही मी वाचलो. त्यानंतर मला एकदा आईनं कडेवर घेतलं होतं आणि एका गाईनं धक्का मारल्यामुळे मी खाली पडलो. मला खूप मार लागला होता; पण मी बचावलो. त्यानंतर एकदा गाडीतून प्रवास करताना मी खाली उतरलो. समोरून ट्रक आला. आमच्या गाडीला धडक दिली. त्या अपघातात माझ्या डोळ्यादेखत आपला चुलतभाऊ मरण पावला. एवढ्या भीषण अपघातात मी अगोदर खाली उतरल्यामुळे वाचलो. माझा देवावर प्रचंड विश्‍वास आहे. मी वाचलो म्हणजे माझ्या हातून भविष्यात काहीतरी निश्‍चित चांगलंच घडणार आहे, असा ठाम विश्‍वास माझ्या मनात निर्माण झाला आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीतूनच बघायचं, हा विचार आला.

अतुल - तुला आलेल्या पहिल्या प्रेमपत्रामुळे तुझी चांगलीच फजिती झाली होती ना रे?
अजय - तेव्हा आपण "खेड'मध्ये राहत होतो. मी दहावीत होतो. त्या काळात "खेड'सारख्या एका गावात मुलगा आणि मुलगी बोलतात, हेदेखील "फार' होतं. सातवीतली एक मुलगी काहीतरी निमित्त काढून आपल्या घरी येऊ लागली होती. ती घरी आली की मी मात्र निमूटपणे निघून जात होतो. एकदा तर त्या मुलीनं धाडस केलं. दहावीचं "बेस्ट ऑफ लक' देण्याच्या निमित्तानं ती आपल्या घरी आली आणि तिने चक्क गुलाबाचं फूल आणि एक पत्र माझ्या हातात दिलं. ते आईनं बघितलं. मी ते पत्र न वाचताच आईकडे सुपूर्द केलं. पण या प्रकरणात माझी काहीही चूक नव्हती. त्यामुळे आई मला ओरडली नाही. त्या मुलीचं आपल्याकडे येणं मात्र बंद झालं.

अतुल - मी तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा असल्याने शाळेत असताना तुला या गोष्टीचा फायदा झाला की तोटा-
अजय - थोडा तोटा आणि जास्त फायदा. कारण तू शाळेत व्रात्य असल्यामुळे "गोगावले अतुल'चा भाऊ ना, म्हणजे तो व्रात्यच असणार, अशी सुरुवातीला माझी इमेज झाली होती. पण मी व्रात्यपणा करीत नाही, हे लवकरच सर्वांना जाणवलं. तुला असणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आवडीमुळे मलाही कलेची आवड असणार, हेदेखील गृहीत धरलं गेलं आणि मला तो फायदाच झाला. तू एनसीसी सार्जंट होतास, मी वर्गातला मॉनिटर होतो. मलाही एनसीसीमध्ये थेट प्रवेश मिळाला. सकाळची प्रार्थना मी म्हणायचो. तू एनसीसीचं ड्रील मला घरी आधीच शिकवलंस. हे सगळे तुझ्या "दादा' असण्याचे मला झालेले फायदे आहेत.

अतुल - आपण करिअरसाठी जेव्हा मुंबईला अप-डाऊन करू लागलो होतो, तेव्हा आई-बाबांच्या पाया पडताना तू का रडायचास?
अजय - अतुल, तू जसा बिनधास्त होतास ना, तसा मी नव्हतो. शिवाय आई-वडिलांना सोडून मी एकदा दूर असा राहिलोही नव्हतो. मी खूप इमोशनल आहे. मुंबई हे मोठं शहर, आपण आधी खेडेगावातून तिथं जाणार, अशा संमिश्र भावनांमुळे; तसंच मुंबईत करिअरची संधी मिळणार, याच्या आनंदानंही डोळे भरून यायचे माझे!
अतुल - घरच्यांना न सांगता तू नदीवर पोहायला कसा शिकलास?
अजय - मी पोहायला शिकावं अशी माझ्या मित्राची इच्छा होती. गावात नदीवर कंबरेला डबा बांधून माझ्या मित्रानं मला पोहायला शिकवलं. आपण बुडणार नाही, याची खात्री झाल्यावर मला पोहणं जमू लागलं. घरी न सांगता मी गुपचूपपणे नदीवर पोहायला जाऊ लागलो. मी तुझ्या मदतीशिवाय केलेली आणि लहानपणी शिकलेली गोष्ट म्हणजे "पोहणे'.

अतुल - तू कोरसमध्ये गातोस, तेव्हा तुला काय वाटतं?
अजय - मी कोरसमध्ये गातो, याची मला अजिबात लाज वाटत नाही. पुण्यात आपण असतानाही मी कोरस गायचो. आज आपण संगीतबद्ध केलेल्या "कोरस'मध्येही मी गातोच! "झील' नावाचा जो प्रकार आहे, तो मी शिकलो ते त्या काळात कुणाची तरी कॉपी केल्यामुळेच.

अतुल - इतर संगीत-दिग्दर्शक तुला जेव्हा "गायक' म्हणून बोलावतात, तेव्हा कसं वाटतं?
अजय - चांगलंच वाटतं. एक संगीतकार जेव्हा दुसऱ्या संगीतकाराला "गायक' म्हणून बोलावतो, तेव्हा त्या संगीतकाराबद्दल मला खूपच आदर वाटतो. मी जे गाऊ शकतो, ते मी संगीतकार असल्यामुळेच. एका संगीतकाराला एखाद्या गायकाकडून नेमकं काय हवं असतं, हे मी जाणू शकतो, ते मी एक संगीतकार असल्यामुळेच. मला "संगीतकार' म्हणून जे कळतं, ते देण्याचा, ते त्या संगीतकाराच्या भावना काय आहेत ते जाणून घेऊन त्या पद्धतीनं गाण्याच्या माध्यमातून मी व्यक्त करतो.

अतुल - तू की-बोर्ड वाजवायला कसा शिकलास?
अजय - मला बासरी, माऊथ ऑर्गन ही वाद्यं येत होती. पण मी पेटी फारशी वाजवली नव्हती. वाद्य वाजवणं हे एक तंत्र आहे. पण ते वाजवताना "भावना' जास्त महत्त्वाच्या आहेत, असं मी मानतो. त्या भावनांच्या प्रवाहातच मला सूर सापडले आणि मला "की-बोर्ड' येऊ लागला. भावनांचा जसा अंत नाही, तसाच वाद्यांद्वारे निर्माण करणाऱ्या नवीन प्रयोगांना, सुधारणांनाही अंत नाही.

अतुल - एखाद्या अनोळखी माणसाबरोबर तू मनापासून काम करू शकत नाहीस ना?
अजय - "अनोळखी' असं म्हणण्यापेक्षा मी जोपर्यंत एखाद्याला "मित्र' म्हणून स्वीकारत नाही, तोपर्यंत मी त्या व्यक्तीचं काम नाही करू शकत. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीशी एक "माणूस' म्हणून माझे सूर जुळत नाहीत, तोपर्यंत मी काम करू शकत नाही. संगीत ही कला आहे. "अमुक एक करावं' अशी ऑर्डर तुम्ही या कलेत देऊ शकत नाही. तिथे ट्युनिंग जमणं हे महत्त्वाचं आहे.

अतुल - तुला घरचं खाणं कमी आणि बाहेरचे खाद्यपदार्थ जास्त आवडतात, त्याविषयी सांग.
अजय - एकंदरीतच खाद्यसंस्कृतीशी माझं जवळचं नातं आहे. पण त्यातही वरणभात, पोळीभाजी अशा टिपीकल जेवणापेक्षा वडापाव, मिसळ, समोसा, पोहे या गोष्टी मला जास्त आवडतात. मुंबई-पुण्यातच काय; पण ठिकठिकाणची अप्रतिम खाद्यपदार्थ देणारी हॉटेल्स, धाबे, टपऱ्या मी शोधून काढल्यात.

अतुल - तुझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण...
अजय - माझ्या मुलाचा जन्म आणि "इलाय राजा'ची भेट.

अतुल - माझ्या स्वभावातील कोणती गोष्ट तुला आवडत नाही?
अजय - तू जेव्हा एखाद्या गोष्टीवरून पटकन्‌ चिडतोस तेव्हा...

अतुल - तुझ्या आयुष्यावर प्रभाव पाडणारे दुसरे संगीतकार कोण?
अजय - लक्ष्मीकांत प्यारेलाल, मदन मोहन, शंकर-जयकिशन, सलील चौधरी, आर. डी. बर्मन, बप्पी लाहिरी, पं. हृदयनाथ मंगेशकर, राम कदम, विश्‍वनाथ मोरे, राम-लक्ष्मण, जॉन विल्यम्स, जॅरी गोल्डस्मिथ, बिथोन, मोझार्ट, सॅम्युअल बार्बर हे सगळेच माझं आदराचं स्थान आहेत आणि सर्वात महत्त्वाचं नाव इलाई राजा!

अतुल - पण इलाई राजाच का?
अजय - इलाई राजा हे माझ्यासाठी द्रोणाचार्य आहेत. ही व्यक्ती म्हणजे एक चमत्कार आहे. संगीत ही फक्त नृत्याकरिता केलेली व्यवस्था नसून ती एक दैवी देणगी आहे आणि नुसती दैवी देणगी नव्हे; तर मनाला डोलवणारी दैवी देणगी. हे मला समजलं ते "इलाई राजा' या व्यक्तिमत्त्वामुळे. संगीतकलेकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन अंतर्बाह्य बदलला तो त्यांच्यामुळेच!
अतुल - पुढच्या आयुष्यातील तुझं ध्येय....
अजय - मराठी संगीत संपूर्ण जगात पोहोचवायचं आहे. आज मराठी माणूस जसा पाश्‍चात्य गाण्यांचा आनंद घेतो, तसं ज्यांना मराठी भाषा येत नाही, त्यांनीदेखील मराठी संगीताचा आनंद घ्यावा, अशा पद्धतीनं मला संगीतकलेला जगभरात पोहोचवायचं आहे. पाश्‍चात्यांनाही मराठी गाणी आवडतील, त्यासाठी काम करायचं आहे.

अतुल - माणूस म्हणून पुढचा जन्म मिळाला तर कोण व्हायला आवडेल?
अजय - संगीतकलेचं रीतसर प्रशिक्षण घेतलेला संगीतकार आणि संगीतकारच!

अतुल - या क्षेत्रात येणाऱ्या नवीन संगीतकारांना काय सांगशील?
अजय - गायकांच्या बाबतीत कधीकधी असं होतं, की ते गायक एखाद्या विशिष्ट गायकीत, गाण्याच्या प्रकारात अडकून जातात. संगीतकारानं असं एखाद्या विशिष्ट पद्धतीत कधीच अडकू नये. केवळ एकाच पद्धतीच्या चाली देऊन संगीतकार होऊ शकत नाही. संगीतकाराला सर्व भावना, घटना समजायला हव्यात. त्यानुसार विविध पद्धतीचा बाज त्यांनी वापरायला हवा. तो "व्हर्सटाइल' असावा. संगीतकार जर संगीत-संयोजक असेल तर उत्तमच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं संगीत दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तुम्ही तुमच्या नजरेतून त्याला योग्य रंगरूप देऊन सजवणं आणि लोकांच्या मनापर्यंत पोहोचविणं आवश्‍यक आहे.

[Source : esakal]

Monday, March 30, 2009

काही लाज ?

च्यायला आज एक न्यूज़ ऐकली... कसाब ला वकील दिला.
डोक्यात पाणी झाले आहे का भारत सरकारच्या ??
आईचा घो..त्याला कसला वकील देतात ?? लाथ घाला त्याच्या कंबरेत .
मला दया आली आज आपल्या नियमांची.

च्यायला एक माणूस इंडिया मधे येऊन धिंगाणा घालतो..इतक्या सर्व लोकांना मारतो .
आणि त्याच देशाचे सरकार त्याला वकील देते ? काय चाललाय काय हे ?

आणि त्याला वकील तरी का म्हणून द्यावा ?
कॅमरा मधे धडधडीत दिसतो आहे तो..स्वताहा काबुल केले आहे त्याने की मीच लोकांना मारले.
आणखी काय पाहिजे ? भारत सरकारच्या असल्या वागण्यावर कीव येते मला.
ह्या लोकांचे कुणी मेले नाहीत ना त्या दिवशी म्हणून हा सगळा नंगा नाच सुरू आहे.

आणि परत ह्या देशावर कुणी असा हल्ला करणार नाही ह्याची काय गरेंटी ?
कसाब ला अशी कुठली शिक्षा दिली आपण की जी पाहून बाकीचे आतँकवाद थांबवतील??

खरच आज मनापासून वाटते की शिवाजी महाराज पाहिजे होते.
सळसळत्या तलवारीने त्यांनी नक्कीच कसाब चे धड वेगळे केले असते.
त्यांच्या सारख्या लोकांची ह्या देशाला गरज आहे.
ही नेते मंडळी साली सर्व fuckoff आहे.
आणि ह्या देशातले हीरो सुद्धा बघा..
तो शाहरूख कॉंग्रेस चा प्रचार करतो आहे...च्यायला पैशासाठी हे लोक अजुन काय काय करतील काय माहिती.
लाजा कशा वाटत नाही ह्यांना ?

Monday, March 23, 2009

चुक की बरोबर ...

राज त्या दिवशी मला भेटला. माझा अगदी जवळचा मित्र..शाळेपासून बरोबर आणि एकदम बोलका.
पण नेहमी सारखा बोलला नाही..इकडच्या तिकडच्या गप्पा मारुन तो निघून गेला.
मला मात्र काही राहावेना. ह्याला नक्की काय झाले असेल ह्या विचारणे मला रात्र भर झोप आली नाही.
मी ठरवले. उद्या त्याला गाठायचे आणि विचारायचे.

ठरल्याप्रमाणे तो मला भेटला.
मी सुरवात केली.
मी - काय झाले आहे राज ? इतका गप्प का तू ?
तो - काही नाही
मी - काही नाही कसे ? तुझ्या अवतारा वरुनच समजते आहे .. सांग काय झाले ते ?

तो - काही नाही रे मामला बिकट आहे. कुणाला ही न सांगन्या सारखा. तू माझा बालपणीचा मित्र म्हणून सांगतो.

महिन्याभरा पुर्वी माझे लग्न झाले.
उत्तम सून मिळाल्यामुळे घरचे जम खुश.. मी ही छान बायको मिळाल्या मुळे खुश.
सर्व कसे मस्त जमून आले.
पण लागणा नंतर काही दिवसांनी अचानक बायको तुटक तुटक वागू लागली.
इतरण समोर ती छान वागायची ..पण एकंतात असतांना मात्र माझ्याशी अलिप्त राहायची.
काही ना काही कारण काढून ती माझ्या पासून दूर राहनेच पसंत करू लागली.
मला काही समजत नाही तिला काय झाले आहे म्हणून.
बर घरात कुणाशी बोलावं तर, सर्व जन म्हणतील - इतक्या गुणी मुलीला तू उगाच नाव ठेवत आहे. म्हणून तिथे ही बोलायची चोरी.

विषय इतका नाजूक आहे की मी कुठेही बोलू शकत नाही.
तिच्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला मी. पण ती काहीच सांगत नाही.
मला हळू हळू एकटे वाटायला लागले आहे स्वतहाच्याच घरात.
कुणीतरी आनंदाचे बटन आयुष्यातून स्विच ऑफ केल्या सारखे वाटते.
मनात नको नको ते विचार येतात. अगदी जीव घेणा प्रकार होतो.
मी कुठल्या गोष्टीत कमी तर पडत नाहीए ना अशी एक भीती सारखी वाटत राहते.

त्याचा परिणाम आता कामात पडू लागला आहे.
बॉस रोज शिव्या घालतो. कामात 1000 चुका होतात.
जेवणात मूड लागत नाही...सारखा एकच विचार..."मी कुठे चुकतो आहे ?" बस्सससस्स्स्स्स्स्स्स्स....

बायको म्हणून मी तिने जवळ राहावे अशी अपेक्षा केली तर मी कुठे चुकलो ?
की मला अपेक्षा करायचा अधिकारच नाही ?

मला असे पाहून ऑफीस मधली सोनिया त्या दिवशी मला समजावायला आली.
काय झाले आहे हे जरी मी तिला सांगितले नसले तरी तिने मला छान दिलासा दिला.
लग्नापूर्वी तिने मला स्वताहहून लग्नासाठी विचारले होते.
पण घरचे परवानगी देणार नाही म्हणून मी तिला सरळ नाही म्हणून सांगितले होते.
मला माहीत आहे तिचे अजूनही माझ्यावर प्रेम आहे.
आता घरात असा प्रकार चालू असतांना मला तिची सोबत आवडते.
उगाच तिला नाही म्हणून मी चुकी केली असे वाटते.
घरी जाण्यापेक्षा मला तिच्या सोबत वेळ घालवायला आवडतो.

शेवटी मी ही एक माणूस आहे .. मला ही वाटते की माझ्यावर कुणीतरी प्रेम करावे.
आणि ते प्रेम जर मला सोनिया कडून मिळणार असेल तर किती दिवस मी माझ्या मनावर ताबा ठेवणार ?
मला ही काही भावना आहेत. विचार आहे.
त्यांचा असा गळा घोटून मी तरी किती दिवस जिवंत राहणार ?

असे नाही की मी काही प्रयत्न नाही केला ह्या प्रकारमधे.
पण जर समोरचा माणूस मदत करणाराच नसेल तर मग काय अर्थ उरतो प्रयत्न करायला ?

संपूर्ण आयुष्य असे काढण्यापेक्षा मी थोडे दिवस आनंदाने काढले तर मग बिघडले कुठे ?
हो मला सोनिया आता जास्त जवळची वाटते..पण मग मी त्याला काय करू ?
आयुष्यात एखादी गोष्ट एका दुकानात नाही मिळाली तर आपण दुसर्या दुकानात जातोच ना ?
मग मी ही थोडा आनंद मिळवण्यासाठी दुसरीकडे गेलो तर माझे काय बिघडले मग ?

मला नाही जगता येणार असे एकटे आयुष्य भर ...
कदाचित मी वेडा होईन असल्या वातावरणात काही दिवस आणखीन राहून.
म्हणूंच मी हा मार्ग निवडला आहे आता...
एवढे म्हणून त्याने मला प्रश्न केला... -- मला सांग मी केले ते बरोबर केले ना ?

ह्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ते मला काही समजले नाही...मी तसाच शांतपणे घरी आलो.
राज च्या आयुष्यात असे काही होईल असे स्वप्नात सुद्धा कधी वाटलें नव्हते.
ह्याच विचारात अनेक दिवस गेले.
आणि एक दिवस राज मला अचानक भेटला थियेटर मधे...आनंदी दिसत होता ..आणि त्याच्या सोबत होती सोनिया....

तो बरोबर वागला की चुक हे काही मला ठाऊक नाही...
पण हो तो आनंदी होता हे नक्की.....

Nano आली रे..

आजच टीवी वर पहिले ..
टाटा इस लॉंचिंग टाटा नानो...ते मोस्ट अवेटेड कार
न्यूज़ वल्यांनी जनतेचे इंटरव्यू दाखवले.
सर्व जन एकच सांगत होते...."आता सामान्य लोक सुद्धा कार घेऊ शकतील "
हो ते तर आहेच..पण किमतीच्या बाबतीत तुम्ही फसले जाऊ नये म्हणून थोडे लिखाण काम करत आहे मी.

नानो अगदीच काही 1 लाख रुपयांना मिळणार नाही.
तिचे 3 मॉडेल्स टाटा ने बाजारात काढले आहेत.
सर्वात चिप जे आहे त्यात काहीच फेसिलिटी नाहीत...एसी पवर स्टियरिंग काही नाही..
बाकीच्या मॉडेल्स मधे काही फसिटलित्य दिल्या आहेत त्यांनी.

सर्व जन ह्या गाडीचे कौतिक करण्यात गुंग असले तरी मला मात्र एक गोष्टीची जाम काळजी वाटते.
ह्या गाडी च्या सेफ्टी बद्दल मी अजूनही कन्फ्यूज़ आहे. मला बोनेट नसलेल्या गाड्या चालवायला खूप भीती वाटते.
कारण समोरून कुणी ठोकले तर बचावसाती काहीच उरत नाही. म्हणून मला लांब (बोनेट) असलेल्या गाड्या आवडतात.
अर्थात हे झाले माझे मत.
तुम्हाला काय वाटते ते पहा आणि ठरवा गाडी घ्यायची की नाही ते.

दुसरी एक गोष्ट म्हणजे ट्रॅफिक ...त्याची तर वाट लागणारच...
आज काळ कॉलेज मधले बहुतेक स्टूडेंट्स महागड्या बाइक्स कॉलेज मधे आणतांना दिसतात.
आता बाप ही विचार करेल .. ह्याला 90 हजाराची बाइक घेण्यापेक्षा एक नानो घेऊन देऊ म्हणजे सुट्टी च्या दिवशी तीच गाडी मलाही वापरता येईल...नाही का ?
बस मग काय सर्व लोक नानो नानो करतील..आणि टाटा मात्र मस्त खीषे भरेल.
बाकी सर्व लोकांकडे नानो असतांना लोक शाईनिंग कशी मारतील काय माहिती.
पुर्वी जशी मारुती 800 असणार्‍यांना मध्यम वर्गीय समाजचे तसेच काहीसे नानो चे होणार ...

आणखी एक गोष्ट तुम्हाला माहिती नसेल तर.
नानो च्या फक्त मागच्या टाइयर ला स्टेपणी आहे.
म्हणजे चुकुन तुमचे पुढचे टाइयर पंक्चर झाले तर त्याला ही स्टेपणी चालणार नाही.
वेळ मारुन नेण्याकरता तुम्ही वापरु शकता ही स्टेपणी पण इतर वेळी नाही.
कारण नानो चे दोन्ही चाक वेग वेगळे आहेत. पुढचे टाइयर स्लीम आहे तर मागचे ब्रॉड ( कारण एंजिन मागे आहे).

ही तर फक्त एक सुरवात आहे..पण अशा बर्‍याच त्रुटी ह्या गाडीत निघण्याची शक्यता आहे.
कारण 1 लाखत गाडी देणे गंमत नाही. टाटा ने छान प्रयत्न केला आहे, पण आता बघू पुढे काय होते ते.

माझे ऐकल तर गाडी लगेच बुक करण्याच्या भानगडीत पडू नका..

WAIT FOR REVIEW AND THEN DECIDE.... TILL THEN WAIT AND WATCH...

लिखानकाम सुरू...

आज माझ्या जुन्या ऑफीस मधे गेलो होतो.
मजा आली..सर्व जुनी मंडळी भेटली...आणि काही पोरी पण दिसल्या.
काही नवीन आणि काही जुन्या.
आपल्याला त्या गचाळ ऑफीस मधली एकही गचाळ पोरगी आवडत नाही..खरं सांगतो..
सर्व पोरी आपल्या डोक्यात जातात..आहो असतील देखण्या तर सांगाव ना...
उगाच उद्या राखी सावंत मकडली तर ती काही मधुबाला दिसणार आहे का ?
च्यायला ह्यांना पगार टिचभर पण नखरा पाहावा तर काय सांगणे...वा वा...
जाऊद्या आपल्या बपाचे काहीही जात नाही आणि जाणार पण नाही...
मला इथे फक्त ईतकेच सांगायचे आहे की "माझे लग्न झाले आहे .. आणि मला कुठल्याही पोरी कडे पाहण्याची आवड आणि गरज दोन्ही ही नाही..
तेव्हा फक्त उद्या रस्त्यात चुकुन कधी दिसल्याच आपण तरी उगाच नाक मुरदू नये...मला तुमच्या कडे पाहायला वेळ आणि हौस नाही..

नेक्स्ट..

हा तर मी सांगत होतो...पोरं भेटली सर्वांनी आग्रह केला की मी ब्लॉग लिहीणे का बंद केले म्हणून...
आणि ब्लॉग आवडळ्याची पावती ही दिली.
मला फार आनंद झाला..
हा तर ब्लॉग लिहीणे बंद केले नाही..
बस थोडा वेळ कमी पडतो आहे सध्या..म्हणून थोडे थोडे लेट होते..ईतकेच..

पण थोडा धीर धरा..
मै जरूर लिखूंगा...ये वादा है मेरा...
सध्या साठी जाता जाता ...

तिला पहिले मी...ती होती अगदी सुंदर ...
तिच्या नयनांनी केले माझ्या मनाला आतुर...

तिला पाहून मग मी वेडा झालो..
तिच्या विचारात पुरता बुडून गेलो...

ती असावी जवळ असे सारखे वाटते...
नी नसली की जिणे भकास वाटते..

तिच्या सहवासात मला आनंद मिळतो...
ती नसली की मग मी असाच जळतो...

तिच्यावाचून जिणे ?? कल्पनाच नाही ...
तिच्या वाचून माझी , कोरीच वही..

तिच्यासाठीच जन्म, तिच्यासाठीच प्राण...
तिच्यावाचून नाही जाणार प्राण


ती ध्यास ती भास..
ती स्वप्न ती श्वास...

तीच माझ्या प्रेमाचा पाया
अशी ती माझी विजया...

टिप - कविता चोरलेली नसून स्वतहाच लिहिलेली आहे..


पैसा...

राम आणि शाम दोघे मित्र...
दोघे एकदम हुशार आणि मेहनती...
दोघे उच्च शिक्षीत...
कॉलेज संपल्यानंतर ते एके ठिकाणी इंटरव्यू साठी गेले...
इंटरव्यू झाला ...
राम पास तर शाम नापास झाला..
राम ने तिथेच 1-2 वर्ष काढली...शाम ने दुसर्या कंपनी मधे जॉब सुरू केला..
राम ची कंपनी मोठी असल्याने त्याचा पगार लगेच वाढत गेला..
शाम ची कंपनी छोटी होती म्हणून त्याचा पगार काही वाढला नाही..
राम छान पैकी पैसे कमवायला लागला...शाम कसबसा जगू लागला...
राम ला पैशांची मग हाव सुटली...शाम मात्र शांत होता..जे मिळेल त्यात समाधानी होता..
राम ने मग नोकर्या बदलायला सुरवात केली...एक झाली की दुसरी...
शाम ने मात्र एकाच कंपनी मधे जम बसवला..
राम ने पैसे मिळवण्याच्या नादात गाव सोडले..दुसर्या गावी जाऊन तो जॉब करू लागला...घरापासून दूर...
शाम सुद्धा हुशार असल्याने त्याला ही अशा ऑफर येऊ लागल्या...
राम ने क्षणाचाही विचार करता लगेच दुसर्या गावी बिस्तर हलवले..
शाम ने मात्र आपल्याच गावात राहण्याचा निर्णय घेतला..आणि त्याने दुसर्या कंपनी ला नाही म्हणून सांगितले...
राम पैशासाठी मग गावोगवी फिरू लागला...त्याला पैसा मिळत होता पण टेन्षन सुद्धा तितकेच वाढत होते...
बरोबर कुणी नाही...बस तो एकटा आणि पैसे...घरची मंडळी सुद्धा नाही...
इकडे शाम घरच्या लोकांबरोबर खुश होता..पैसे कमी मिळत असले तरी तो समाधानी होता...
आणि मिळणार्या पैशांवर घर चालवत होता..कुठलीही हाव करता...
राम ने परगावी छान घर बांधले...आलिशान एकदम मोठे...
पण त्या घरात राहायला लोकं मिळेनात...तो एकटा भुता सारखा राहू लागला...
इकडे शाम ने गावातले आपले घर मिळणार्या पैशांमधे दुरुस्त करून घेतले...
घर लहान होते पण घरातले मनाणे मोठे होते...

राम च्या घरात सर्व सुख सोयी होत्या .. पण त्याचे काही मन लागेना...
त्याला आधरची गरज होती..पण जवळ कुणीच नव्हते...
या उलट शाम कडे आधार होता..आई आणि वडिलांचा ..आणि गावात राहणार्या आपल्या मित्र मंडळींचा...
खूप वर्ष लोटले गेले...

60 वर्षांनंतर....
राम ने गडगंज प्रॉपर्टी कमावली...
शाम मात्र 60 वर्षं पुर्वी होता तसाच राहिला..गरीब...
दोघेही अचानक मरण पावले...
दोघेही रिकाम्या हाताने आले होते आणि रिकाम्या हातानेच त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला...
राम च्या बरोबर त्याने कमावलेली प्रॉपर्टी आली नाही...पण हे पाहायला तो जिवंत राहिला नव्हता..
त्याने आयुष्य भर मर मर केली...कशासाठी ?? पैशासाठी ???
पण त्याच्या सोबत काय आले ??? 1 रुपया सुद्धा नाही...
ज्या पैशांवर त्याने इतके जिवापाड प्रेम केले त्यानेच त्याला असा दगा दिला...

राम ने संपूर्ण आयुष्य एकटयानेच काढले...
ज्या वयात आई वडिलांना त्याची गरज होती त्या वेळी तो पैशाच्या मागे होता..
जगाच्या नजरेत राम एक यशस्वी माणूस होता...आणि शाम एक अपयशी माणूस...
पण त्यांच्या आई वडिलांच्या नजरेत तर काही और होते...
खरच राम यशस्वी होता का ??? आणि शाम अयशस्वी ???

विरलेले स्वप्न...

अथक परिश्रमा नंतर मधु सॉफ्टवेर इंजिनियर झाला.
घरी जाम आनंदाचे वातावरण होते. आता तरी घरची परिस्थिती थोडी सुधारेल म्हणून वडीलही निर्धास्त होते.
आयुष्य भर काम करून करून जाम झाले होते बिचारे.
मधु ने पण मग विचार केला, ह्यापुढे घराला काहीही कमी पडू देणार नाही.
त्या नुकत्याच कॉलेज मधे पास झालेल्या मुलाने मग गरूड झेप घेतली.
आई वडील अडाणी असले तरी मधु ने मात्र रक्ताचे पाणी करून शिक्षण पूर्ण केले. सर्व इछा मारुन मारुन अनेक वर्ष जगत् राहिला.पण आता त्याला जग जिंकायचे होते आणि तो जग जिंकण्यासाठी निघाला होता.
तो राहत असलेल्या चळितच सुषमा राहायची. लहानपणापासूनच त्याचा तिच्यावर जीव होता.
पण गरीबीच्या मारांने तो इतका झुकला होता की त्याला वर तोंड करून तिच्यावर प्रेम जाहीर करणे ही कधी जमले नाही. सुषमा त्याची परिस्थिती जाणून होती. तिलाही तो मनापासून आवडायचा. काही वेळा शब्द महत्वाचे नसतात, त्याचप्रमाणे त्यांचे अबोले प्रेम चालू होते.
आता मधूच्या सर्व चिंता संपल्या होत्या..तो एक उच्च शिक्षीत माणूस झाला होता.
तोडा फार सेट्ल होऊन सुषमा ला तो आपल्या प्रेमा बद्दल सांगणार होता.
पण त्याला पुढे घडणार्या गोष्टींची कल्पनाही नव्हती.

मुळातच हुशार असलेल्या मधु ला अगदी कमी वेळातच चांगली नोकरी सुद्धा मिळाली.
आनंदी झालेल्या मधु ने देवाचे आभार मानले. मनात सुप्त असलेल्या इच्छा आता जाग्या होऊ लागल्या.
आयुष्य भर चाळीत ल्या त्या 10 बाय 10 च्या खुरड्यात काढल्यावर त्याने लगेच कर्ज घेऊन आई वडिलांना एका मस्त प्रशस्त फ्लॅट मधे आणले.
पगार चांगला असल्याने बँकेनेही कसलीही नाटके केली नाहीत आणि सरळ कर्ज मंजूर केले. मधु खूप खुश होता. त्याने मन भरून आपल्या आई वडिलांना प्रेम दिले होते आणि आज तो त्यांच्या साठी काही तरी करत होता, ह्या भावनेनेच तो भारावून गेला होता.
जागा आईसपाईस मोठी मिळाली तरी मनाच्या कोपर्यातून सुषमा चा रड्वेला चेहरा काही जाईना.
चाळ सोडतांना खिडकीतून हळूच डोकवून पाहणारी आणि डोळ्यात पाणी भरलेली सुषमा त्याला आठवली की मग त्याचे मन वेडे पिसे होऊन जात.
पण आपल्याला आवडलेली सुषमा आपल्या घरच्यांना आवडणार नाही हे त्याला ठाऊक होते...
असला विचार करून मग तो आणखीनच बिथरून जायचा.

आजही त्याला तो दिवस लक्षात होता ज्या दिवशी सुषमाचे लग्न ठरले होते.
तो लग्नाचा दिवसाही त्याला लख्ख आठवत होता. असे काही होईल असे त्याला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते.
सुषमा लग्न करून गेली पण तिच्या आठवनी काही मधु च्या मनातून जाईना.
कसे बसे त्याने स्वताहाला सावरले. आणि थोड्याच दिवसात तो तिला अगदी विसरून सुद्धा गेला होता.

कसाबसा आयुष्य जगण्याचा तो प्रयत्न करत होता.
पण नियतीला काही औरच मान्य होते.
लग्न होऊन 2-3 महिनेही होत नाही तोच मधु ला सुषमा चाळीत दिसली.
त्याच्या काळजाचा ठाव गेला. निदान सुषमा बरोबर तरी असे व्हायला नको होते.
इतक्या दिवस गुलाबी निळ्या जांभळ्या रंगात नाहाणार्या सुषमच्या अंगावर पांढरा शुभ्र रंग बिलकुल शोभत नव्हता.
हो, सुषमा लग्न करून गेल्या नंतर अवघ्या 2 महिन्यातच तिच्या नवर्याचे निधन झाले होते.
संपूर्ण आयुष्य तिच्या समोर ओस टाकून तो तिला एकटीला सोडून निघून गेला होता.
त्या बिचारीचा ह्यात काहीही दोष नसतांना तिला सासर कडच्या लोकांनी असे उघड्यावर टाकले होते.
त्या रात्री मधु खूप रडला. पण त्याचा आता काहीही उपयोग होणार नव्हता. होणारी गोष्ट होऊन गेली होती.

हा सर्व जुना विचार करत असतांनाच त्याला जाग आली. आपले आई वडील अशा मुलीला स्वीकारणार नाही हे त्याने जाणले.
मधु मोठ्या धर्म संकटात सापडला होता.
एकीकडे संपूर्ण आयुष्य ज्यांनी आपल्यासाठी कष्ट केले ते आई वडील आणि दुसरीकडे सुषमा.
ह्या दोघांचा मेळ घालणे त्याला काही जमत नव्हते.

गरीब आणि म्हातारे आई वडील आणि एकटी पडलेली सुषमा दोघांनाही आधारची गरज होती.
आणि त्या सर्वांनपेक्षा खरी आधारची गरज होती ती मधु ला....तो फार एकटा पडला होता.
काय करावे कळेना...कुणाला सांगावे ते ही कळेना...
तो आतल्या आत घुस्मटुन गेला होता.
त्याने घरी 1-2 वेळा विषय सुद्धा काढले पण काही उपयोग झाला नाही.
व्यवहारी जगाला भवनाप्रधान मधु चे म्हणणे पटत नव्हते.

तिकडे सुषमा ही बैचैन होती.
तिच्या समोर पूर्ण आयुष्य पडले होते. मनातले प्रेम ओठांवर आणण्यासाठी आता फार उशीर झाला होता.
दुख म्हणून तरी किती दिवस करत बसणार...शेवटी पोटा पाण्यासाठी काहीतरी करणे तिला भाग होते.
तिने मग एके ठिकाणी जॉब सुरू केला..थोड्याश्या पगारावर ती जेमतेम भागवू लागली.
मनाच्या कुठल्याश्या कोपर्यात मधु चा विचार सतत चालू असायचा..आणि हे सत्य ही समोर असायचे की मधु चे प्रेम हे माझ्यासाठी मृगजळ आहे.
कामात लक्ष लागेना.
तिकडे सुषमा ला तसल्या अवस्थेत पहिल्यापासून मधु चे ही कामात लक्ष लागेना..
दोघेही बैचैन झाले होते.
एखाद्या माणसावर प्रेम असतांना त्याचा सहवास मिळणे ह्यासारखे दुसरे नरक नाही..
तोच नरक ही दोघं रोज अनुभवत होती...प्रत्येक क्षणाला....

सुषमा ची तब्येत सुद्धा खालावात चालली होती.
सारखे सारखे विचार करून आजारपण वाढु लागले होते.
राहून सुषमाने शेवटी निर्णय घेतला.
एक पत्र लिहून तिने मधु चा कायमचा निरोप घेतला.
त्या पत्रात काय होते ते कुणालाही माहिती नाही...पण त्या नंतर मधु सुन्न झाला.
त्याने सर्वांशी बोलणे ही कमी केले...हळू हळू तो गपप्च झाला.
पुढे डोक्यावर परिणाम झाल्याने त्याला हॉस्पिटल मधे भरती करावे लागले..पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

आज सुषमा कुठे आहे हे कुणालाही ठाऊक नाही ...ती कुठे गेली ? का गेली ? कधी गेली..काही पत्ता नाही...
पण तुम्ही नीट शोधलित तर ती नक्की सापडेल .....मधु च्या हृदयात...कायमची...

जग जिंकायला निघालेल्या मधु चा दुर्दैवी अंत झाला....