Tuesday, February 10, 2009

Life is calling....

आता गप्प बस...
मी मनाला पकडून सांगून टाकले आहे...
पण ते काही माझे ऐकत नाही...
सारखे सैरा वैरा धावत असते....लगाम नसलेल्या घोड्यसारखे...
जसा पाण्यात दगड टाकल्यावर पाणी स्थिर व्हायला खूप वेळ लागतो तसे काहीसे माझ्या मनाचे आहे...
एकदा विचार चक्र चालू झाले की मग ते बंद होणारच नाही...

आज माझी गाडी सिग्नल जवळ येऊन थांबली...
मी गाडीची काच खाली केली आणि सिग्नल कधी संपतो याची वाट पाहायला लागलो....
इतक्यात एक लहानसा मुलगा आणि बहुधा त्याची बहीण असावी अशी एक मुलगी माझ्या गाडी जवळ आले...
कपड्यांवरून ते गरीब वाटत होते...
घाई घाई ने त्यांनी गाडी पुसायला सुरवात केली....
हा प्रसंग काही नवीन नव्हता मला ... पण एरवी लक्ष देणारा मी, पण आज माझ्या मनात विचारांचे काहूर माजले...

कसे जगत् असतील हे ...???
आपल्या सारख्यांना जिथे इतका पगार असूनही पुरत नाही...आणि उरत नाही...
ह्या असल्या काळात ह्यांचे कसे भागत असेल ???
बरं ह्यांना जन्म देणारे आई वडील तरी ह्यांचा विचार करत असतील का ?
काय भवितव्य आहे ह्यांचे... ???
ठीक आहे आज दया आली म्हणा किवा काहीही म्हणा त्यांना आपण पैसे देणार...पण उद्याचे काय ??
शेवटी मी सुद्धा एक माणूस आहे..रोज रोज पैसे देणे परवडेल का मला ह्यांना.. ??


मी एकदा असेच एकदा एका गरीब माणसाला पैसे दिले होते..पण त्याने माझ्या समोर जाऊन बीडी विकत घेतली...
दुख: झाले मला पण एकदा पैसे दिले की त्याचा विचार नसतो करायचा..म्हणून मी विचार करायचा नाही असे ठरवले...
पण माझे मन ऐकेल तर शप्पत....




काय करता येईल आपल्याला ह्या लोकांसाठी ह्याच्याच विचारात आहे मी सध्या...
मला माहिती आहे की मी जास्त काही करू शकत नाही...पण थोडे तरी करू शकतो ना मी...
म्हणूनच मी तर ठरवले आहे की उगाच मंदिरात दान-धर्म करण्यापेक्षा मी ते पैसे गरीब लोकांसाठी वापरणार आहे...आणि सद्ध्या वापरत आहे...

मंदिरात दान-धर्म करण्यावर आपला विश्वास नाही...
त्यापेक्षा त्या मंदिराच्याच बाहेर बसलेल्या एखाद्या अपंग माणसाला जर थोडी मदत केली तरी देव प्रसन्न झाल्यावाचून राहणार नाही...

देवाला 5-10 रुपयांची माळ घालण्यापेक्षा तेच पैसे एखाद्या जिवंत माणसाचे कमीत कमी पोट भरू शकते...
ह्याचा अर्थ मी देवाला मानत नाही असे नाही...पण मी मानसांमधे देव पाहणारा माणूस आहे...

मित्रांनो आपल्यालाच काहीतरी केले पाहिजे ह्याच्यासाठी...
तुम्ही अगदी काही नाही तर एखाद्या गरीब मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घ्या...
त्याचा फक्त पुस्तकांचा खर्च उचला....बस बाकी काही मागने नाही....

जवळपासच्या शाळेत जा...तिथे प्रिन्सिपल ला भेटा..
ते संगतील की किती मुलांना मदतीची गरज आहे...त्यातील कमीत कमी एकाची जबाबदारी तरी घ्या...

तुम्हाला कदाचित ही गंमत वाटत असेल...पण हो तुम्ही हे करू शकता...
जो पर्यंत ह्या देशाचा तरुण जागा होत नाही तो पर्यंत ह्या देशात काही ही होऊ शकत नाही...
आणि 1-2 हजार रुपयांनी तुमचे काही काही होईल असे मला वाटत नाही...

मला काही पुढारी वैगेरे बनायचे नाहीए...पण फक्त मनात जे विचार चालू होते त्यांना मी एक वाट करून दिली आहे...
शेवटी पैसे आणि निर्णय तुमचाच आहे...

ह्या देशाचे काही ही होऊ शकत नाही असे आपण म्हणतो...पण मग आपण काय करतो त्यासाठी ??
कुठून तरी सुरवात करावी लागणार आहे आपल्याला... मग आज पासूनच का नको ???

लहानपण देगा देवा...

मी बालपणी एकदम हुशार होतो...
आताही आहे पण आता शिंग फुटले आहे असे लोक म्हणतात...(मी बैल नसलो तरी... असो)

मी हुशार कसा होतो ते तुम्हाला सांगतो...
मला लहानपणी हमखास विचारले जायचे..."मोठ्यापनी तू काय होणार ????"

मी आपला मनाला वाटेल ते फेकायचो...
फेकायची सवय मला तिथुनच लागली...
कधी डॉक्टर कधी इंजिनियर कधी आर्मी मधे सैनिक...काय वाटेल ते...
आणि महत्वाचे म्हणजे समोरच्याला ऐकायला आवडेल ते मी काही ही फेकायचो...

पण अगदी खर सांगायचे तर मला ड्राइवर व्हयायचे होते...
माझे गाड्यांवर अतिशय प्रेम होते आणि आहे...
त्यामुळेच मला ड्राइवर व्हयायचे होते...पण फक्त मर्सिडीस गाडी चा च...
पण ते काही होऊ शकले नाही... असो..

लहानपणी आम्ही चाळीत राहत असु...
त्यामुळे आमचे विचार सुद्धा 10 x 10 चेच छोटे छोटे असायचे ...
शाळेपासून तर घरा पर्यंत सॉलिड मार खाल्ला मी....
अगदी एकही दिवस असा गेला नाही माझ्या आयुष्यात की ज्या दिवशी मी मार खाल्ला नाही...
सर मॅडम तर हात धून मागे लागलेले असायचे...
त्यांना कोण समजून सांगणार की सर्व जन न्यूटन..आइनस्टाइन नाही होऊ शकत ....
काही लोक सामान्य सुद्धा असतात...
आणि मला खरच रस नव्हता असले कोणी मोठे होण्याचा...
मी अरविंद म्हणूनच खुश होतो...आणि समाधानी होतो

आता मागे वळून पाहतो तर लक्षात येते की लहानपनीच्या काही स्वप्नांचा चुराडा झाला आहे....
जगाच्या रहाट गाडग्यात पिळून निघलेलो आहे....
लहानपणी पैसे नव्हते पण गरज ही वाटली नाही कधी त्याची...
शाळेत अक्षरशहा: फाटलेले कपडे घालून जायचो मी..पण त्याची लाज कधी बाळगली नाही ...
बरोबरीच्या मुलांचे छान छान कपडे, खेळणी ई. पहिले की वाटायचे आपल्याला कधी मिळणार हे सर्व....

कॉलेज मधे साधी साइकल सुद्धा नव्हती....आणि आज काळ चे मुलं मस्त गाडी फिरवतात...
वा वा..मज्जा आहे...

त्यावेळी साधे चॉक्लेट जरी मागितले तरी घरीची मंडळी आणि मास्टर म्हणायचे.... "स्वताहा कमव आणि मग सांग...."
कधी काहीही नवीन मागितले की हे उत्तर तैयार असायचे...
आजच्या जमान्यात बहुधा पालक असले प्रश्न विचारायला धजावत नसतील ...

पोरगं मागतय गाडी, घोडे आणि आई बाप देताय...
काय वाट्टेल ती हाउस पूर्ण करताते...पण त्यामुळे मुलगा वाईट वळनाला वैइगेरे लागत नाहीए ना ह्याची काळजी त्यांना नाही...

आमच्या वेळी मुलं सुद्धा आपल्या ऐपती प्रमाणे राहायची...
उगाच हे पाहिजे आणि ते पाहिजे असला हट्ट केला जायचा नाही....आणि केला तरी तो पुरवला जायचा नाही...

आज मान उंच करून सांगावेसे वाटते..की आमच्या गुरूंनी आणि घरच्यांनी कधी आयता पाण्याचा ग्लास दिला नाही हातात ...तर विहीर खनायला शिकवले त्यांनी....
पैशाचा आदर करायला शिकवला त्यांनी...जो आज पर्यंत उपयोगी येतो आहे...

आजही पैसे नाहीत असे नाही...
पण दिलेली शिकवण लक्षात आहे माझ्या...
म्हणूनच पैसे असतांनाही पीज़ज़ा हट .. मक्डोनाल्डस ...असल्या ठिकाणी जायची गरज वाटत नाही मला...
अगदी कितीही भूक लागली तर आम्हाला आजही आई च्या हातची भाकरी आणि भाजीच गोड लागते....
याला काही मंडळी कंजूषपणा म्हणतात...पण नो प्रॉब्लेम....छाती ठोकून सांगतो मी की आहे मी कंजूष....
काय करणार असल्या घाण सवयी आहेत आम्हाला...


इतके दिवस झाले लहानपण जाऊन पण अजूनही काही गोष्टी स्वछ लक्षात आहेत माझ्या....

शाळेचा पहिला दिवस...
पहिला वर्ग...
ते मित्र .. आवर्जून उल्लेख करावे असे निलेश सोनवणे आणि पराग पालवे.....
पहिले आणि शेवटचे नवीन दपतर...(ज्याला अलीकडे सॅक म्हणतात)
नवीन पुस्तकाचा वास...
वही आणि पुस्तकाला लावलेले नवीन कव्हर....

अशा कितीतरी गोष्टी स्मरणात आहेत माझ्या.... ज्या मी मेल्या शिवाय तरी मिटल्या जाणार नाही....