Monday, February 2, 2009

दोस्ती....

काल मी असाच ऑफीस मधे बसलो होतो...नेहमीसारखा विचार करत...आणि कोडिंग चे प्रॉब्लेम सॉल्व करत..
इतक्यात एक मित्र ऑनलाइन भेटला..म्हणाला अरविंद हे गाणे ऐकले आहे का ??
मी म्हणालो कुठले बुवा... तो बोलला -- "तोबा तेरा जलवा, तोबा तेरा प्यार...तेरा एमोसिनल अत्याचार...."
मी म्हणालो नाही बाबा..
तो म्हणाला जरूर ऐक एकदम झाक्कस आहे... मी ही विचार करून खूप वैतगलो होतो, म्हनून
म्हटले चला मस्त गाणे ऐकून मूड बनवू...
मग मी ते गाणे घाई घाईने डाउनलोड केले...आणि ऐकले ....
साला असला संताप झाला म्हणून सांगू...एकदम बकवास गाणे होते ते...
हे बघा पोरं असं काहीतरी करतात...पण मित्र आहे ना काय करणार ..??? पण नंतर जेव्हा मी ते गाणं खूप वेळा ऐकले तेव्हा तेच डोक्यात बसले...आणि आता मी सुद्धा दुसर्यांना हेच गाणे रेफर करतो आहे... हा हा हा हा

पण काहीही म्हणा...मित्र असले की बरं वाटतं....
पोरं त्रास देतात .. पण मजा वाटते...आणि ती नसली की आयुष्य भकास वाटते...

अर्ज किया है...

"राह चलते को राह भुलाते है दोस्त...
सोडा बोलके दारू पिलाते है दोस्त....
कूछ भी करलो बोहोत पकाते है दोस्त...
लेकिन याद साले बोहोत आते है दोस्त.... "


कॉलेज मधले आयुष्य मस्त होते...
हसा खेळा...लाइन मारा... टाइम पास करा... घरी जा ... झोपा...मग कुणीतर मित्र घरी येतो..तो लात घालून उठवतो...म्हणतो चाल...
आपण विचारायचे नाही...गप्प रस्ता पकडायचा...तो कट्यावर नेतो...
मग तिकडे कुठल्याशा पोरीचे विषय निघतात...सर्वे जन मनसोक्त तोंड सुख घेतात...आणि पुन्हा रात्री जेवण झाल्यावर सुटटा मारणे के लिये कट्टा....

लोक म्हणतात आजची पोरं वाया गेली...
पण ते पॉज़िटिव विचार का करत नाही..
कुठल्याही कट्यावर जा...तिकडे एका काडेपेटीच्या कडीत कमीत कमी 10 सिगरेट सहज पेट्टात...इतकी बचत करत असेल का कुणी जगात..??? सांगा ???

सॉलिड ऐश होती..त्या वेळी..

सुदैवाने मला खूप छान मित्र भेटले... (ते सुद्धा बहुधा हेच म्हणत असावे ... हा हा हा )
नासिकमधे ... पुण्यात...आणि मुंबई मधे सुद्धा...

सर्वांची फार आठवण येते पण काही फोन करणे जमत नाही...
कारण जग झोपते तेव्हा अरविंद जागा असतो आणि अरविंद जागा असतो तेव्हा जग झोपते.... असा काहीसा उल्टा प्रकार आहे....
म्हणून मुद्दाम मी ही पोस्ट लिहायला घेतली...

काही मित्र माझे असे आहेत की ज्यांच्या तोंडून भेटल्यावर शिव्या ऐकल्यशिवय मला दिवस जातच नाही...
आणि काहींना शिव्या दिल्याशिवाय राहावत नाही...

मित्र होतात सुद्धा एकदम पटकन....
त्याला काही रुल नाही...आता माझेच बघा ना...
कॉलेज च्या पहिल्या दिवशी मी ज्याच्याशी मारामारी केली तोच माझा एकदम जिगरी मित्र होईल असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते मला....

कॉलेज मधे असतांना शिकलो होतो....
जर
अ = ब आणि ब = क
तर

अ = क

हे मी बर्‍याच वेळा दोस्ती मधे अनुभवले आहे...

दोस्ती चा महिमा फार थोर आहे..हे काय मी सांगायला नकोच...
जय आणि वीरू ने ते आधीच सिद्ध केले आहे...
उगाच नाही त्यांनी गाडीचे पेट्रोल वाया घालवुन " ये दोस्ती हम नाही छोडें गे.... " गाणे म्हटले...

मैत्री तून अनेक नाती निघतात...
अगदी अचानक पणे...
कधी भाऊ .. कधी बहीण ( हे सध्या तरी क्वचितच ) ..कधी प्रेमिका (हे जरा जास्त च) ..कधी प्रेमी....
अगदी माझे लग्न झाले ती माझी बायको सुद्दा माझी कित्येक वर्ष मैत्रीण होती...

मला फक्त काही लोकांचा राग येतो ...
उदा. स्मिता पाटील, राज कपूर...इ.इ.
ह्यांनी काहीशा प्रमाणात दोस्ती ला काळिमा फसला आहे...
कसा ???
आहो तिचे ते गाणे नाही का ???

"दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है...
उमर भर का गम हमे इनाम दिया है... "

कुठला गम दिला काय माहीत...बहुतेक फाविकोल दिला असेल...

आणि राज कपूर चे "दोस्त दोस्त ना राहा..."

पण आजही दिल चाहता है चे गाणे ऐकले की मस्त वाटते...
आणि आठवतो तो मैत्रीतला प्रवास...
सहज...सुखकर...हळवा..निस्वारथी....प्रेमळ...स्वछन्दि...भाऊूक आणि हवा हवा सा....

2 comments:

rajesh said...

hmm rite friend's are the one with whom u share the things whether its good or bad...& if they are not their life seems to be boring... Im really Blessed with a good friend circle and i feels im lucky enough to have all of them...

Harshal said...

jyala mitr astat tyala veglya shatrunchi garaj nasate...

ha ha ha !!!!

Nice post !!!!