Wednesday, February 4, 2009

स्वदेश....

समाजाला लागलेला एक घाण रोग म्हणजे...." पाय ओढणे "
मी अनेक वेळा पहिले आहे...सर्व जन आपापले बघण्यात इतके गुंग झाले आहेत की त्यांना दुसर्‍याचे कौतुक करायला वेळ नाही...
किंबहुना दुसर्यांचे कौतुक केल्यावर जणू काही आपल्या खिशातले पैईसेच जाणार अशी काही मंडळी वागतात...
मला सांगा ना...एखाद्याने चांगले काम केले..तर मग "अरे वा मस्त..." एवढे म्हणायला कुणाच्या बपाचे काय जाते..
पण नाही...जिथे तिथे ईगो मधे आंलच पाहिजे..त्या शिवाय तर इंच भारही हलत नाही...
एखाद्याला चांगली नोकरी लागली की मनात नुसती आग आग होते..वर दिसत नसली तरीही...
लगेच पगार विचारला जातो...
जे लोक नोकरी लागल्यावर पगार विचारतात त्यांच्या कणखाली द्याविशी वाटते...
हे लोक स्वतहचा पगार मात्र कुणालाही समजू देत नाही..किंबहुना ह्यांच्या घरी सुद्धा माहिती नसते की आपल्या दिव्याला किती पगार आहे...
पण हे लोक दुसर्‍याचा पगार मात्र खोडून खोडून विचारतात...

आणि असल्या विचारण्याला कारण बहुतेक वेळा हेच असते की "माझा पगार किती ने कमी किंवा जास्त आहे..."

पुढे थोडे विषयांतर झाल्या सारखे वाटेल..पण तो ही पैशाचाच एक भाग आहे...

सोडून द्या हे सर्व...

पगारामुळे जर माणूस मोठा छोटा झाला असता तर मग काय होते...
पैशामुळे आपण स्वतहाची फार ओढाताण करतो आहोत मित्रांनो...
माझे काही मित्र आहे जे परदेशी आहेत...पण सगळी कडे प्रॉब्लम्स आहेत...
तिकडे राहूनही ते काय करतात ?? ऑफीस वरुन घरी आल्यावर घरीच जेवण बनवतात...
एकही मित्र नाही ... घरची मंडळी नाही...
आहे फक्त पैसा....अमाप पैसा...

असा पैसा काय कामाचा ???

अर्थात कशाला प्राधान्य द्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे..
पण माझे विचाराल तर -- मला पैसा नको...बस हवा तो सहवास...आपल्या लोकांचा....
पोटा पुरता पैसा मिळाला की बस..बाकी काही नको...

आणि घरच्यांना सोडून राहणे तर नकोच नको...
मग तुम्ही मला घर-कोंबडा म्हणा नाहीतर होम सिक म्हणा....आहे मी...

2 वर्ष मुंबई मधे काढली आहेत मी..
माणूस स्वतहाची ओळख विसरून जातो त्या दिव्यांच्या झगमगाटात......
आणि काही बनण्यासाठी आपले गाव सोडावे लागते असे थोडेच आहे...??
असे कितीतरी उदाहरणे आहेत की ज्यांनी आपल्या गावात राहून पूर्ण देश आणि विदेश सुद्धा गाजवला आहे...
हा मोठ्या शहरामधे संधी जास्त आहेत..पण तुमच्याकडे क्षमता असली की झाले..बाकी काही लागत नाही...

आपल्याला अगदी मोहन भार्गव नाही बनायचे ..पण कमीत कमी मेलराम तर बनू शकतो ना आपण ???

तुम्ही फांदीवर बसलेला पक्षी बघितला असेलच कधी....
तो त्या फांदीवर अवलंबुन नसतोच कधी....कारण त्याला त्याच्या पंखांवर पूर्ण विश्वास असतो....
आणि सिह हा नेहमी जंगलातच शोभून दिसतो....

आणि आयुष्याच्या वळणावर जर कधी ठेच लागलीच ...
तर मागे वळून पाहिल्यावर हाकेच्या अंतरावर जवळचे कोणी हवे...बरोबर ना ?

5 comments:

vikas said...

mast re sharyaaa!!!

Harshal said...

chyayla... tu kay aikat nahis re...
ekdum jhakkaas lihitos.

tujya likhanala kholi ni rundi yetey aajkal... keep it up

rag yenar nasel tar vicharto
kay re pagar kay milto halli tula?

ha ha hi hi hu hu

Jai said...

Again Good One........
Subject is reallly good....
Keep it up............

V said...

Nice.....

keep it up.....

Devendra said...

आज तुम्ही underwear घातली का ? आणि तुमचा पगार किती आहे ? हे २ प्रश्न माज्हा मते सारखेच आहेत. very very personal questions.